India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

हा तर लोकशाहीचा गळा घोटणारा निर्णय

India Darpan by India Darpan
July 22, 2020
in Uncategorized
0

भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई ः आपत्तीकाळात विरोधी पक्षासकट सर्वांना बरोबर घेऊन जाण्याऐवजी विरोधी पक्ष नेत्यांनी आयोजित केलेल्या बैठकांवर निर्बंध घालण्याचा सरकारचा निर्णय लॊकशाहीवर घाला घालणारा आहे  अशी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. या निर्णयाद्वारे सरकार लोकभावनांना चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे ,  असेही उपाध्ये यांनी म्हटले आहे.

    विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे गेल्या काही दिवसांत राज्याचा दौरा करून कोरोना महामारीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी चालू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. आपल्या दौऱ्यात या दोघा नेत्यांनी सरकारी रुग्णालयांना भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली आहे. सर्व संबंधीत सरकारी अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून माहिती घेतली. या दौऱ्यात लोक मोठ्या आशेने विरोधी पक्षांकडे पहात होते. त्यांच्या दौऱ्यामुळे  लोकांना दिलासा मिळत होता. महाराष्ट्रातील कोरोना स्थिती वास्तवाकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे लक्षही वेधले होते.

    श्री. उपाध्ये यांनी म्हटले आहे की, या काळात सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी राज्यभर दौरे करून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणे अपेक्षित होते. मात्र मुख्यमंत्री मुंबईतही हिंडण्याचे धाडस दाखवीत नाहीत. अशा स्थितीत उपाययोजनांचा आढावा घेणे व त्यातील त्रुटी सरकारला दाखवून देणे हे विरोधी पक्ष नेत्यांचे कर्तव्य आहे. श्री. फडणवीस व श्री. दरेकर यांच्या दौऱ्यांमुळे आपले अपयश जनतेपुढे येऊ लागल्याची भीती मुख्यमंत्र्यांना वाटू लागली असावी. त्यामुळेच लोकशाहीवर आघात करणारा तुघलकी निर्णय या सरकारने घेतला आहे.

    या आपत्तीकालात राजकारण बाजूला ठेऊन सर्वांना सोबत घेऊन जायच्या ऐवजी राज्यातील सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांवर  बंदी घालण्याचा प्रयत्न करीत आहे हे लोकशाही विरोधी असून जनतेच्या दरबारात याची तीव्र प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही, असेही श्री. उपाध्ये यांनी पत्रकात नमूद केले आहे.


Previous Post

मागासवर्गीयांच्या संविधानिक अधिकारांची जपणूक व्हावी

Next Post

महिला रुग्णालयाचे काम ३१ जुलैपर्यंत पूर्ण करा

Next Post

महिला रुग्णालयाचे काम ३१ जुलैपर्यंत पूर्ण करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group