India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सरकारी नोकरींसाठी आता देशभरात एकच परीक्षा! मोदी सरकारचा निर्णय

India Darpan by India Darpan
August 20, 2020
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली – राष्ट्रीय भर्ती संस्था स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१९ ऑगस्ट) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली.

नोकरभर्तीची तरुणांची जुनी मागणी लक्षात घेऊन मंत्रिमंडळाने सामायिक पात्रता परीक्षा घेण्यासाठी ही भर्ती संस्था स्थापन करायचा निर्णय घेतला. यासाठी सुमारे पंधराशे कोटी रुपयांची तरतूदही मंत्रिमंडळाने केली आहे. गट ‘ब’ आणि ‘क’ साठी ही भर्ती संस्था सामायिक पात्रता परीक्षा आयोजित करेल, आणि पात्र उमेदवारांची यादी बनवेल. उमेदवारांच्या निवासस्थानापासून जवळच्या ठिकाणी परीक्षा केंद्र असावं यासाठी ११७ जिल्ह्यांमध्ये परीक्षेसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उभारल्या जाणार आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने, साखर कारखान्यांकडून ऊसाला मिळणारा रास्त हमीभावही निश्चित केला. २०२०-२०२१ च्या गळीत हंगामासाठी ऊसाचा भाव, १० टक्के रिकव्हरि रेटसाठी २ हजार ८५० रुपये प्रति टन इतका निश्चित केला आहे. खाजगी- सरकारी भागीदारीच्या माध्यमातून देशातले तीन विमानतळ भाडेतत्वावर द्यायलाही मंत्रीमंडळानं मंजूरी दिली. जयपूर, गोहारी आणि तिरुवनंतपुरम इथले प्राधिकरणाचे विमानतळ यासाठी निवडले आहेत.

परीक्षेचे वैशिष्ट्य

नोकरीसाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परीक्षा संस्था (नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी) मध्ये एकदाच नोंदणी करावी लागेल. या संस्थेने घेतलेली परीक्षा दिली की नोकरीसाठी विद्यार्थ्यांना अन्य परीक्षा देण्याची गरज राहणार नाही., असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे. या एकाच परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करुन विद्यार्थी नोकरी मिळवू शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Previous Post

नोकरी इच्छुक उमेदवारांनो, ३१ ऑगस्टपर्यंत हे नक्की कराच

Next Post

भाक्षी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना घातला घेराव

Next Post

भाक्षी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना घातला घेराव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राशीभविष्य

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवा, जाणून घ्या, शनिवार – ३० सप्टेंबर २०२३ चे राशिभविष्य

September 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

धक्कादायक…..दिडोंरीत बलात्काराच्या गुन्हात अटक असलेला आरोपी नाशिकमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेला.. बघा…नेमकं काय घडलं

September 29, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – इंग्रजीचे महत्त्व

September 29, 2023

दिंडोरी तालुक्यात शाळेच्या आवारात झालेल्या गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम वादात, शिक्षणमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

September 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

मतदार यादीचे काम करतानाच शिक्षकाचा मृत्यू… जळगाव जिल्ह्यातील घटना…

September 29, 2023

कर्मयोगीनगरमध्ये अभूतपूर्व उत्साहात गणेश विसर्जन; तीन हजार आठशे मूर्ती, दोन ट्रॅक्टर निर्माल्य संकलन

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group