India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विनानुदानित शिक्षकांना अनुदानाचा निर्णय लवकरच; खैरे यांचे पायी दिंडी आंदोलन मागे

India Darpan by India Darpan
August 12, 2020
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई – राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान द्या व सेवा संरक्षण देण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद येथून सुरु झालेले शिक्षक नेते गजानन खैरे यांचे अन्नत्याग पायी दिंडी आंदोलन मंगळवारी (११ ऑगस्ट) १६ व्या दिवशी मागे घेण्यात आले. विनानुदानित शिक्षकांना अनुदान देण्यासाठी शासन अनुकूल असून लवकरच निर्णय घेतला जाईल. त्यासाठी मी स्वत पुढाकार घेतला असल्याचे आश्वासन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.
प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान द्यावे, विनाअनुदानित अंशतः अनुदानित व अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबाद येथून नवयुग शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रा. गजानन खैरे अन्नत्याग करून पायी दिंडीने मंत्रालयाकडे निघाले होते. त्याच्यासाबोत चार शिक्षकही आंदोलनात सहभागी असून नाशिक येथे त्यांची प्रकृती खालावली होती. याबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी रविवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई यांचे या पायी दिंडी संदर्भात लक्ष वेधले होते. त्या पार्श्वभूमीवर दराडे यांच्यासह शिक्षक आमदारांच्या पुढाकारातून मंत्रालयात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठकीत चर्चा झाली. शिक्षण मंत्र्यांकडून समाधानकारक आश्‍वासन मिळाल्याने खैरे यांनी गायकवाड तसेच आमदार दराडे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन १६ व्या दिवशी आपले आंदोलन मागे घेतले.
या बैठकीला शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा, दत्तात्रय सावंत,बाळाराम पाटील, कपिल पाटील,सतीश चव्हाण,सुधीर तांबे, संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज गायकवाड, आंदोलनकर्ते अनिस कुरेशी, रवींद्र महाजन, वसंत पानसरे, कमलेश राजपूत आदी उपस्थिती होते.
शासनाने आतापर्यंत असंख्य आश्वासने दिली मात्र अनुदानाचा निर्णय घेतलाच नसून राज्यातील ५० हजार शिक्षक यामुळे उपाशीपोटी काम करत आहे.अनेकांना कुटुंबाचा गाडा चालविणे मुश्किल झाल्याने रोजंदारीची वेळ आली असून काहींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शिक्षक आमदारांनीही अनुदान नसल्याने गंभीर बनलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.
विनानुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण देण्याचाही शब्द गायकवाड यांनी दिला. तर प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.


Previous Post

सर्वोच्च आणि ऐतिहासिक! वडिलांच्या संपत्तीत मुलीचाही वाटा

Next Post

अभिनेता संजय दत्त यास फुफ्फुसाचा कर्करोग

Next Post

अभिनेता संजय दत्त यास फुफ्फुसाचा कर्करोग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्हायरल व्हिडीओ; रस्त्यावर लावलेली दुचाकी रात्री जेव्हा अचानक सुरू होते (बघा व्हिडिओ)

February 3, 2023

येवला – वैजापूर रोडवर मालट्रक पलटी; चालक गंभीर जखमी.

February 3, 2023

‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांना मातृशोक; कर्मकांडाला फाटा देत घेतला हा निर्णय

February 3, 2023

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023

मालेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा; या कारणाने केला होता खून

February 3, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group