बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस

by India Darpan
ऑगस्ट 6, 2020 | 9:51 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
NPIC 202085154855

मुंबई – राजधानी मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. मुंबईत अवघ्या चार तासांमध्ये ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत सखल भागात पाणी भरले असून, गांधी मार्केट माटुंगा, हिंदमाता, बीपीटी कॉलनी,चेंबूर रेल्वे स्थानक, पोस्टल कॉलनी चेंबूर या भागात अजूनही पाण्याचा निचरा झाला नसल्याने  या भागातली वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुरू आहे.

गेल्या २४ तासात कुलाबा येथे ५३.२ मिलिमीटर आणि सांताक्रुझ येथे ८४.३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.
मुंबई, पुणे, नाशिक आणि राज्याच्या अन्य भागाला सलग दुसऱ्या दिवशी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रायगड  जिल्हयात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्याती सर्व नद्यांना पूर आला असून नदी काठावरच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडत असून जगबुडी आणि बावनदी या दोन नद्यांनी धोक्यााची पातळी ओलांडली आहे. रत्नागिरी तालुक्यात बावनदीचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक  सकाळपासून बंद करण्यात आली आहे. वाशिष्ठी, काजळी आणि कोदवली या नद्या धोक्याच्या  पातळीवरून  वाहू लागल्या आहेत. त्यामुळे चिपळूण आणि राजापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सांगली जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरु असून  वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे,  तर जत,आटपाडी,खानापूर, कवठे महांकाळ या दुष्काळी भागातही पावसानं  चांगली सुरुवात केली आहे. पावसाने पुन्हा चांगली सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५२.७५ मि.मी. पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी ५८२.९८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी वाढली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक मनपाच्या आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

Next Post

पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री ठाकरेंना तातडीने फोन

India Darpan

Next Post

पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री ठाकरेंना तातडीने फोन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011