India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस

India Darpan by India Darpan
August 6, 2020
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई – राजधानी मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. मुंबईत अवघ्या चार तासांमध्ये ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत सखल भागात पाणी भरले असून, गांधी मार्केट माटुंगा, हिंदमाता, बीपीटी कॉलनी,चेंबूर रेल्वे स्थानक, पोस्टल कॉलनी चेंबूर या भागात अजूनही पाण्याचा निचरा झाला नसल्याने  या भागातली वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुरू आहे.

गेल्या २४ तासात कुलाबा येथे ५३.२ मिलिमीटर आणि सांताक्रुझ येथे ८४.३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.
मुंबई, पुणे, नाशिक आणि राज्याच्या अन्य भागाला सलग दुसऱ्या दिवशी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रायगड  जिल्हयात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्याती सर्व नद्यांना पूर आला असून नदी काठावरच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडत असून जगबुडी आणि बावनदी या दोन नद्यांनी धोक्यााची पातळी ओलांडली आहे. रत्नागिरी तालुक्यात बावनदीचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक  सकाळपासून बंद करण्यात आली आहे. वाशिष्ठी, काजळी आणि कोदवली या नद्या धोक्याच्या  पातळीवरून  वाहू लागल्या आहेत. त्यामुळे चिपळूण आणि राजापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सांगली जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरु असून  वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे,  तर जत,आटपाडी,खानापूर, कवठे महांकाळ या दुष्काळी भागातही पावसानं  चांगली सुरुवात केली आहे. पावसाने पुन्हा चांगली सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५२.७५ मि.मी. पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी ५८२.९८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी वाढली आहे.

Previous Post

नाशिक मनपाच्या आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

Next Post

पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री ठाकरेंना तातडीने फोन

Next Post

पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री ठाकरेंना तातडीने फोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घटस्फोटांच्या चर्चांवर अखेर रणवीर सिंगने सोडले मौन; म्हणाला…

March 31, 2023

केवळ न्यायालयीन लढ्यावर इतक्या कोटींचा खर्च; अद्यापही न्यायालयाचा निकाल नाही

March 31, 2023

पीएमश्री योजनेत राज्यातील एवढ्या शाळांची निवड; केंद्र सरकारने दिली मान्यता

March 31, 2023

काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास

March 31, 2023

भाजप आमदारांचा कारभार कसा आहे? पक्षाने केले सर्वेक्षण… असा आहे त्याचा निष्कर्ष…

March 31, 2023

यंदाचे मराठी साहित्य संमेलन अमळनेरमध्ये? हालचालींना वेग

March 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group