मुंबई – गेल्या दोन दिवसापासून मुंबई व उपनगरात कोसळत असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पावसाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक ती सर्व मदत करण्याची ग्वाही दिली आहे.