मालेगाव – केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी मालेगाव येथे निर्यातबंदी आदेशाची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी शेतकरी फाशी घेत असतांनाचा प्रतिकात्मक जिवंत देखाव्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सटाणा नाका ते तहसील कार्यलयादरम्यान चाललेल्या या प्रतिकात्मक अंत्ययात्रेत शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून केंद्र सरकारच्या कांदा विषयक धोरणांचा निषेध केला. तहसील कार्यालयाजवळ हे आंदोलन पोलिसांनी थांबवल्यानंतर तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.