नवी दिल्ली – भारताने आतापर्यंत २ कोटी २ लाख २ हजार ८५८ कोरोना चाचण्या पूर्ण करत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. आक्रमकतेने चाचण्या करणे, कार्यक्षमतेने माग काढणे ,विलगीकरण आणि त्वरित उपचार या केंद्रसरकारच्या महत्वपूर्ण धोरणाचा वापर कोविड १९ च्या व्यवस्थापनासाठी करत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी याचा अवलंब केल्याने हे शक्य झाले आहे. या धोरणाच्या प्रभावी कार्यवाहीमुळे देशभरातील कोविड चाचण्यांचा वेग वाढला असून व्यापक प्रमाणात लोकांना या चाचण्यांचा लाभ घेता येत आहे.
गेल्या २४ तासांत ३ लाख ८१ हजार २७ चाचण्या पूर्ण झाल्या असून, दर दहा लाखांत १४ हजार ६४० इतका या चाचण्यांचा (IPM) वेग वाढला आहे. देशात सध्या दर दहा लाखांत १४ हजार ४६० इतक्या चाचण्या होत आहेत. देशातील चाचण्यांचा(TPM) वेग सातत्याने वाढत असताना २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात हा दर देशातील सरासरीपेक्षा जास्त आहे.
देशातील प्रयोगशाळांचे जाळे मजबूत करण्यात येत असून देशात आता एकूण १३४८ प्रयोगशाळा असून त्यापैकी ९१४ सरकारी तर ४३४ खाजगी आहेत. त्यात
● रीअल टाईम आरटी पीसीआर आधारित प्रयोगशाळा: ६८६ (सरकारी ४१८ व खाजगी २६८)
● ट्रू नँट आधारित प्रयोगशाळा: ५५६ (सरकारी ४६५ व खाजगी ९१)
● सीबीनअँअँट आधारित प्रयोगशाळा: १०६ (सरकारी ३१ व खाजगी ७५)