India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

व्यथित झालेल्या राज यांनी ठरवलं! असे करणार यापुढे राजकारण

India Darpan by India Darpan
August 18, 2020
in संमिश्र वार्ता
0

नाशिक – नांदेडमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सुनील ईरावर यांनी काही दिवसांपुर्वी आत्महत्या केली. ही आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी राज यांना `साहेब माझ्याकडे जात आणि पैसा हे दोन्हीही नाही, म्हणून जीवन संपवत आहे, असे नमूद केले होते. सुनीलच्या या पत्रानंतर राज ठाकरे हे व्यथीत झाले. त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एक पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणतात,`अरे बाबांनो जात आणि पैशात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे.’

राज ठाकरे…एक प्रभावी व्यक्तीमत्व, परखड भाषा आणि स्पष्टपणे बोलणारे,अन्यायाविरोधात लढणारे, वेळप्रसंगी आपल्या कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर येऊन जशास तसे उत्तर द्या..असे सांगणारे नेते आहे. त्यामुळे त्यांची भाषणे आणि त्यांच्या भेटीने अनेक कार्यकर्ते,पदाधिकारी चार्जे होतात. पण सुनिल ईरावरच्या आत्महत्येने आता काहीसे सारेच दुखावले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना धीर देणारे, मनाला भिडणारे अन् उभारी देणारे पत्र राज ठाकरे यांनी प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांना पाठवले आहे. ते सोशल मिडीयावर नुकतेच व्हायरल झाले. या पत्राची सुरवात त्यांनी माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र केली.ते म्हणतात, संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही, उलट तो मला माझा सोबती वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ उतार हे येणारचं. पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो, पण ह्या संघर्षाला माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेव्हा मात्र मन अस्वस्थेने हेरून जातं. सुनिल ईरावर या आपल्या नांदेडच्या सहकाऱ्याने आत्महत्या केली. ती करतांना त्याने लिहिलय की साहेब जात आणि पैसा हे दोन्हीही माझ्याकडे नाही. त्यामुळे राजकारण करण यापुढे मला शक्य नाही म्हणून मी माझं जीवन संपवत आहे. राजसाहेब मला माफ करा…
व्यथीत राज यांचा संदेश
.सुनिलच्या या वक्त्यामुळे व्यथित झालेले राज पत्रात म्हणतात, अरे बाबांने जातआणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे म्हणूनच ९ मार्च २००६ ला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सुरु केला नवनिर्माणच्या आपल्या ह्या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले चौदा वर्षे आपण हा संघर्ष करतोय,पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्यांची सगळ्यात जास्त दमछाक होते,पण त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ उतारांच्या नंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळली नाही आणि ती ढळू देऊ नका, खचून जाऊ नका, आपल्याला एका नव्या युगाची निर्मिती करायची आणि तो दिवस येईलच,असा विश्वास त्यांनी नमूद केला आहे हे पत्र पदाधिकारी,कार्यकर्ते जास्तीत जास्त लोकांपर्यत कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे.


Previous Post

अखेर आयपीएलचे प्रायोजकत्व या कंपनीकडे

Next Post

पोळ्यानिमित्त युवा शेतकऱ्यांची अनोखी शक्कल; `जीवा शिवाची जोड`ची चर्चा

Next Post

पोळ्यानिमित्त युवा शेतकऱ्यांची अनोखी शक्कल; `जीवा शिवाची जोड`ची चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंडिया दर्पण’मध्ये उलगडणार आता गोदाकाठचे वैभव; इतिहास अभ्यासक देवांग जानी देणार खरीखुरी माहिती

February 3, 2023

बाबो! गल्लीत पार्क केलेली दुचाकी जेव्हा अचानक सुरू होते… कसं काय? तुम्हीच बघा हा व्हायरल व्हिडिओ

February 3, 2023

येवला – वैजापूर रोडवर मालट्रक पलटी; चालक गंभीर जखमी.

February 3, 2023

‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांना मातृशोक; कर्मकांडाला फाटा देत घेतला हा निर्णय

February 3, 2023

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023

मालेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा; या कारणाने केला होता खून

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group