India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धरणसाठ्यात भरघोस वाढ; आगामी ३ दिवस पावसाचेच

India Darpan by India Darpan
August 18, 2020
in संमिश्र वार्ता
0

नाशिक – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात भरघोस वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. तर, आगामी तीन दिवस पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जिल्ह्यात सरासरीच्या १० टक्के अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील धरणसाठा ६२ टक्क्यांवर पोहचला आहे. गंगापूर धरणात सध्या ८२ टक्के पाणी आहे. दारणा धरणही ९३ टक्के भरले आहे. दारणेतून ८ हजार क्युसेक तर नांदूरमध्यमेश्वरमधून १४ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.  भावली. भोजापूर आणि माणिकपुंज ही तीन धरणे १०० टक्के भरली आहेत. नागासाक्या धरणही ८६ टक्के भरले आहे.

हवामान विभागाचा इशारा

निम्न माही,निम्न नर्मदा, निम्न तापी आणि दमणगंगा खोऱ्यात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. येत्या ४-५ दिवसात पावसाची शक्यता लक्षात घेऊन नर्मदा, तापी आणि दमणगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाचा व्यक्त केलेला अंदाज लक्षात घेता वलसाड जिल्ह्यातल्या मधुबन धरणात पाण्याचा प्रचंड ओघ येण्याची शक्यता आहे. सध्या हे धरण ६७ %.भरले आहे. यासंदर्भात परिस्थितीवर लक्ष ठेण्यात येत असून धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग करावा लागल्यास दमण या केंद्र शासित प्रदेशासह संबंधित जिल्ह्यांना त्याची आधी सूचना देऊन आणि योग्य ती काळजी घेऊनच हा विसर्ग केला जाईल.

या भागातली माही नदीवरचे कडाना धरण,पानाम नदीवरचे पानाम धरण,नर्मदा नदीवरचे सरदार सरोवर धरण, तापी नदीवरचे उकाई धरण यासारखी इतर धरणेही मोठ्या प्रमाणात भरण्याची  शक्यता आहे.महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातल्या  हतनूर धरणात आज रात्री पर्यंत  १ हजार ५०५ क्युमेक पाणी तर उकाई धरणात उद्या सकाळ पर्यंत ३ हजार ७०३ क्युमेक पाणी येण्याची शक्यता आहे. त्यांच्या पाणलोट क्षेत्रात अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने अचानक पाण्याचा लोंढा वाढण्याची शक्यता आहे. याचे मानक संचालन पद्धतीनुसार आणि नियमानुसार संबंधीत सर्व जिल्ह्यांना योग्य  वेळेत सूचना देऊन नियमन  करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

किमान १-२ दिवस अतिशय मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता असल्याने गोवा आणि  महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर तापी आणि ताद्री दरम्यानच्या पश्चिमेला वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. या भागातले रस्ते आणि रेल्वे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने आवश्यक खबरदारी घेण्यात यावी. दुर्घटना टाळण्यासाठी रस्ते आणि रेल्वे वाहतूक नियंत्रित करण्याबाबतही काळजी घेण्यात यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.


Previous Post

कोरोनाची भीती घालवा १० मिनिटात; त्यासाठी फक्त हे करा

Next Post

जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात एका पोलिस अधिकाऱ्यासह २ सीआरपीएफ जवान शहीद

Next Post

जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात एका पोलिस अधिकाऱ्यासह २ सीआरपीएफ जवान शहीद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सकाळी नाश्ता न केल्यास कॅन्सरचा धोका ? खरं काय आहे

October 3, 2023

खामगावातील गजानन महाराजांच्या वेशात आलेल्या व्यक्तीचे सत्य झाले असे उघड

October 3, 2023

गोदरेज कुटुंबात फूट, कंपन्यांची होणार फाळणी

October 3, 2023
प्रातिनिधीक फोटो

ग्रामविकास विभागाच्या पदभरतीचा ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ दरम्यान पहिला टप्पा

October 3, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी व्यवहार करताना घ्यावी काळजी, जाणून घ्या बुधवार ४ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 3, 2023

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबर पासून सुरू, असा आहे निवडणूक कार्यक्रम

October 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group