India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दुर्दैव! निवड होऊनही ८ महिने प्रतिक्षेतच; अखेर आता ठिय्या आंदोलन

India Darpan by India Darpan
August 26, 2020
in संमिश्र वार्ता
0

नाशिक – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर्फे कनिष्ठ अभियंता पदासाठी निवड आणि कागदपात्रांची पडताळणी पूर्ण होऊनही तब्बल आठ महिन्यांपासून विद्यार्थी प्रतिक्षेतच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता थेट ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यानिमित्ताने महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ महिने उलटूनही पुढील कोणतीही सूचना महावितरणतर्फे देण्यात आलेली नाही. ऊर्जामंत्री यांची नागपूर येथे भेट झाल्यावर संबंधित प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरु होणार असल्याचे आश्वासन मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. परंतु दिलेले आश्वासन फोल ठरत असल्याने विद्यार्थ्यांनी आता ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. शाश्वती नको ! हक्काची नोकरी हवी असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवल्याने पर्यायी अन्य नोकरीचा विचार विद्यार्थ्यांनी केला नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याअनुषंगाने २ सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. महावितरणचा बेजबाबदारपणा अनेकदा समोर येत असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. वेळोवेळी विचारणा केली असता संबंधित कर्मचारी व अधिकारी उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कनिष्ठ अभियंता पदासोबतच कंत्राटी तत्वावर भरती न झाल्याने विद्यार्थ्यांना नैराश्याला सामोरे जावे लागत आहे. महावितरणतर्फे भरती संदर्भात अनेकदा विद्यार्थ्यांची दिशाभूल होत असल्याने संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यात असमन्वय असल्याचे दिसून येत आहे.

—
गुणपत्रांची पडताळणी झाल्यावर ४५ दिवसात रुजू होण्यासंबंधी माहिती देण्याचा महावितरणचा नियम आहे. परंतु आता आठ महिने उलटूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचेकडे वारंवार विचारणा केली असता उडवाउडविची उत्तरे देण्यात आल्याने आंदोलनाचा पर्याय निवडला आहे. त्याअनुषंगाने २ सप्टेंबरपासून प्रकाशगड येथे आंदोलन होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची यात निवड झाल्याने रुजू कधी होणार याची वाट पाहत आहोत.
– अमोल बोडके, विद्यार्थी


Previous Post

नीरव मोदी प्रकरणात अमेरिकेतून ३.२५ दशलक्ष डॉलर्सची वसुली; एमसीएला पहिले यश

Next Post

आधी वंदू तुज मोरया ! दर्शन घ्या घराघरातल्या बाप्पांचे

Next Post

आधी वंदू तुज मोरया ! दर्शन घ्या घराघरातल्या बाप्पांचे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घटस्फोटांच्या चर्चांवर अखेर रणवीर सिंगने सोडले मौन; म्हणाला…

March 31, 2023

केवळ न्यायालयीन लढ्यावर इतक्या कोटींचा खर्च; अद्यापही न्यायालयाचा निकाल नाही

March 31, 2023

पीएमश्री योजनेत राज्यातील एवढ्या शाळांची निवड; केंद्र सरकारने दिली मान्यता

March 31, 2023

काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास

March 31, 2023

भाजप आमदारांचा कारभार कसा आहे? पक्षाने केले सर्वेक्षण… असा आहे त्याचा निष्कर्ष…

March 31, 2023

यंदाचे मराठी साहित्य संमेलन अमळनेरमध्ये? हालचालींना वेग

March 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group