मुंबई – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख २९ हजार ३५२ गुन्हे दाखल झाले आहेत. ३३ हजार ३६१ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच विविध गुन्ह्यांसाठी २० कोटी ९९ लाख ७८ हजार ८४४ रु. दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.