India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कोरोना काळातही सरकारचा भ्रष्टाचार

India Darpan by India Darpan
July 27, 2020
in Uncategorized
0

भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप
मुंबई ः कोरोना काळातही सरकार भ्रष्टाचार करत आहे. प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भ्रष्टाचाराची ही सगळी प्रकरणे आपल्याला उडकीस आणायची आहेत, असे आवाहनही त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना केले.
भाजपच्या नवनियुक्त पदाधिकऱ्यांसोबत आज पहिली ऑनलाईन बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले की, आपण शेतकऱ्यांना जाहीर केलेली फसवी कर्ज घोषणे विरोधात आंदोलन उभे केले. या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम आज दिसून येत आहे. कोरोना संकटामुळे आपले सर्वच अॅक्टिव्हीटी वर मर्यादा आल्या. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी  या संकट काळात कोणी गरजू उपाशी राहणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी ५२ लाख लोकांपर्यत जेवण पोहोचविण्याचे टार्गेट दिले. सुरुवातीला हे कठीण वाटले मात्र नड्डाजीनी दिव्य शक्तीची जाणीव करून देत मार्गदर्शन केले. यामुळे आज आपल्याकडून २ कोटी ८८ लाख लोकांना फूड पॅकेट आणि ४२ लाख लोकांना रेशन पुरविले. दुसऱ्या टर्मच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाचे टार्गेटही आपण पूर्ण केले. या कार्यक्रमाला २ कोटी १६ लाख लोक सहभागी झाले होते. कोरोना संकट काळातही आपण लोकांच्या समस्या प्रभावीरीत्या सरकार पुढे मांडल्या. ऑनलाईन पद्धतीने मेरा आंगन मेरा रणांगण हे यशस्वी आंदोलन केल्याचे ते म्हणाले.
पाटील यांनी सांगितले की,  दूध आंदोलन उभे करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. यापुढे आपल्याला ३ टप्प्यात काम करायचे आहे.  कोरोना रुग्णाची सेवा, स्क्रिनिंग, विलगीकरन लोकांना मदत करणे. या सगळया सोबत राजकीय लढाई सुद्धा लढायची आहे. सरकार येणे न येणे याची आपण काळजी करू नये. मात्र आपल्या नेत्यावर कोणतेही स्टेटमेंट खपवून घेऊ नये. आक्रमक रीत्या त्याला उत्तर द्यावे. शांत बसणे म्हणजे मान्य करणे असे होते म्हणून आपण उत्तर दिलं पाहिजे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Previous Post

वृक्षारोपण सप्ताहाची सुरुवात

Next Post

लवकरच सहा ठिकाणी स्वॅब सुविधा

Next Post

लवकरच सहा ठिकाणी स्वॅब सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घटस्फोटांच्या चर्चांवर अखेर रणवीर सिंगने सोडले मौन; म्हणाला…

March 31, 2023

केवळ न्यायालयीन लढ्यावर इतक्या कोटींचा खर्च; अद्यापही न्यायालयाचा निकाल नाही

March 31, 2023

पीएमश्री योजनेत राज्यातील एवढ्या शाळांची निवड; केंद्र सरकारने दिली मान्यता

March 31, 2023

काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास

March 31, 2023

भाजप आमदारांचा कारभार कसा आहे? पक्षाने केले सर्वेक्षण… असा आहे त्याचा निष्कर्ष…

March 31, 2023

यंदाचे मराठी साहित्य संमेलन अमळनेरमध्ये? हालचालींना वेग

March 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group