India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

काँग्रेसमध्ये ‘लेटर बॉम्ब’; ज्येष्ठ नेते आणि राहूल यांच्यात जुंपली

India Darpan by India Darpan
August 24, 2020
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली – अध्यक्षपदावरुन काँग्रेसमध्ये ‘लेटर बॉम्ब’ फुटला आहे. पक्षाच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधीना पत्र लिहिले आहे. तर, हे पत्र लिहिणारे भाजपला मदत करीत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यावर काही ज्येष्ठ नेत्यांनी थेट ट्विटरवर प्रतिक्रीया दिली आहे. यासंदर्भातील वृत्त सर्व टिव्ही वाहिन्यांनी दिल्याने हा ‘लेटर बॉम्ब’ चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेऊन राहूल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी या प्रभारी अध्यक्ष आहेत. एक वर्ष उलटले तरी अध्यक्षपदाचा निर्णय झाला नाही. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गांधी कुटुंबाव्यतिरीक्त व्यक्ती अध्यक्ष व्हावी, असे मत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केले आहे. त्यामुळे अध्यक्षपद कुणाकडे जाणार याबाबत उत्सुकता आहे. सोमवारी (२४ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता काँग्रेस कार्यकारिणीची बैठक ऑनलाईन सुरू झाली.

टिव्ही वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वीच २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया यांना पत्र लिहिले. अध्यक्ष कुणीही होवो पण त्याने पूर्णवेळ काम करावे. नेते व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास प्राधान्य द्यावे असे त्यात म्हटले आहे. मात्र, “इच्छा नसतानाही सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद स्वीकारले. त्या रुग्णालयात असताना प्रश्न उपस्थित करणे किती योग्य आहे?,” असा सवाल करीत राहूल यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या वागणुकीवर कठोर शब्दात टीका केली आहे.

सिब्बल यांच्याकडून ते ट्विट डिलिट

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ते ट्विट डिलिट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले होते की “राहुल गांधी म्हणतात आम्ही भाजपशी संधान साधले. राजस्थान हायकोर्टात काँग्रेसची बाजू मी मांडली. भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी पक्षाला मदत केली. गेल्या तीन वर्षात कोणत्याही विषयावर भाजपच्या बाजूने वक्तव्य केले नाही. तरीही आम्ही भाजपला मदत करतोय!”, असे ते ट्विट होते. मात्र, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुंह सूरजेवाला यांनी या वृत्ताचं खंडन केले आहे. राहूल यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही की त्यावर वाद निर्माण झालेला नाही, असे सूरजेवाला यांनी ट्विट करीत स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या लेटर बॉम्ब वरुन पक्षात खळबळ माजली आहे. आता पुढे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


Previous Post

कोरोनाची लस वर्षाअखेरीस? आरोग्यमंत्र्यांचे सूतोवाच

Next Post

किसान रेल्वे आता आठवड्यातून दोनवेळा

Next Post

किसान रेल्वे आता आठवड्यातून दोनवेळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक… अध्यक्षपदासाठी यांच्या नावाची घोषणा…. अजित पवारांचे काय

June 10, 2023

अभिनेते धर्मेंद्र यांनी आईच्या नावाने बांधलेल्या शाळेचे पत्रे उडाले

June 10, 2023
प्रातिनिधीक फोटो

CRPFचा रंगीला जवान… १३ वर्षात केले ५ लग्न… असा झाला भांडाफोड… आता काय होणार

June 10, 2023

प्रिया प्रकाश वारियरची स्मरणशक्ती गेली

June 10, 2023

छोट्या पडद्यावर क्रांती रेडकरचे पुनरागमन

June 10, 2023

खासदाराने संसदेत केले स्तनपान….. सर्व खासदारांनी वाजविल्या टाळ्या

June 10, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group