Last updated on August 20th, 2020 at 02:49 pm
राहूल गांधी यांचा इशारा
नवी दिल्ली ः सरकारने योग्य ती पावले उचलली नाही तर देशात ऑगस्टपर्यंत कोरोना बाधितांचा आकडा २० लाखांवर गेलेला असेल असा इशारा काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी केला आहे. कोरोनाचे आकडे पाहता आपण जगात चौथ्या क्रमांकावर आहोत. सध्या कोरोनाचे देशामध्ये दहा लाख पाच हजार रुग्ण आहेत. अद्यापही सरकार याप्रश्नी गंभीर नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. राहूल गांधी यांनी ट्वीट करुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने ठोस आणि नियोजित पावले उचलायला हवीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.