Last updated on August 2nd, 2020 at 12:13 pm
नवी दिल्ली- अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासंदर्भातील दाखल याचिकेवर आता १० ऑगस्टला सुनावणी होणार आहे. या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाचे काय म्हणणे आहे, अशी विचारणी न्यायालयाने केली. त्यामुळे मंत्रालयाला म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यामुळेच येत्या १० ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, पुढील सुनावणीपर्यंत यूजीसीच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणी अंतरिम आदेश देणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.