India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अनलॉकमध्ये चाचण्या चारपटीने; बाधित वाढले मात्र दहापटीने 

India Darpan by India Darpan
August 3, 2020
in महत्त्वाच्या बातम्या
0

नरेश हाळणोर

नाशिक : १ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात याच काळात बाधितांची संख्या चारपटीने वाढली आहे. २३ मार्च ते ३१ मे या लाॅकडाऊन होते. यादरम्यान जिल्ह्यातील ११ हजार ५९१ नागरिकांची चाचणी केली असता, १ हजार २०३ कोरोनाबाधित आढळून आले होते. तर १ जून ते ३० जुलै या अनलॉक काळात जिल्ह्यात चाचण्यांचे लाॅकडाऊनच्या तुलनेने प्रमाण चारपटीने वाढले, त्यामुळे दहापटीने अधिक बाधितही आढळून आले.
जिल्ह्यात तब्बल ४० हजार १६७ नागरिकांची चाचणी केली असून त्यात १२ हजार ५५६ बाधित आढळून आले. चार महिन्यात जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३ हजार ७५९ इतकी झाली असून त्यातील १० हजार ७१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ४९६ बाधितांचा मृत्यू झाला तर उर्वरीतांवर उपचार सुरु आहेत.
जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओळखून राज्यात २३ मार्च पासून लॉकडाऊन सुरु केले. जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित २९ मार्चला आढळून आला. त्यानंतर जिल्ह्यात मालेगावमध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढल्याचे पहावयास मिळाले. जिल्ह्यात २९ मार्च ते ३१ मे या दोन महिन्यात जिल्ह्यात ११ हजार ५९१ नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यातील १ हजार २०३ बाधित आढळून आले तर ८२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आणि ७२ बाधितांचा मृत्यू झाला. तसेच अनलॉक असलेल्या १ जून ते ३० जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ४० हजार १६७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १२ हजार ५५६ बाधित आढळून आले तर ९ हजार ८९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आणि ४२४ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढलेला दिसून येत आहे. विशेषत: लॉकडाऊन काळात मालेगावमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव असताना अनलॉक काळात तेथील परिस्थिती नियंत्रणात आली. तर नाशिक शहर व ग्रामीण भागात अनलॉक कालावधीत झपाट्याने बाधितांची वाढ झाली आहे.

Previous Post

गर्दीच्या ठिकाणी गणेशोत्सवास मनाई

Next Post

राज्यात पावणे तीन लाख रुग्णांची कोरोनावर मात

Next Post

राज्यात पावणे तीन लाख रुग्णांची कोरोनावर मात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group