येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला येथील मुक्तीभूमी धर्मांतर घोषणेचा ८७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. १३ ऑक्टोंबर रोजी येवला येथील याच मैदानावर महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्व असून दरवर्षी १३ ऑक्टोंबर रोजी येथे राज्यभरातून बाबासाहेबांचे अनुयायी येथिल स्तुपाला वंदन करण्यासाठी येत असतात. यंदा प्रथमच अंजलीताई आंबेडकर येथे कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या. त्यांच्यासह बौध्द भिक्कुंनी स्तुपाला अभिवादन केल्या नंतर गावातून फेरी काढण्यात येऊन पंचशिल ध्वाजारोहन करण्यात आले. दोन वर्ष कोरोनामुळे अत्यंत साध्या पध्दतीने कार्यक्रम झाला होता. यंदा मात्र मोठ्या उत्साहात या ठिकाणी पूर्वी प्रमाणेच विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहे.