अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला तालुक्यातील सायगाव येथील मयूर खैरणार या तरुण शेतकऱ्याने आपल्या उभ्या तीन एकर बाजरी पिकावर नांगर फिरवला आहे. सरकारने रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे. वाढत्या महागाईमध्ये रासायनिक खतांच्या किंमतीत झालेली भरमसाठ वाढ, खतांवर लावलेला जीएसटी, औषधावरील जीएसटी, मजुरांचा अभाव यामुळे या शेतक-याने हा निर्णय घेतला.