इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
त्यालाच हे सामर्थ्य लाभते
‘योगमार्गा’चे जो प्रामाणिकपणे आचरण करतो, त्याला सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्य व शांती लाभतेच. पण बहुसंख्य लोक असे असतात की, जे स्वत:लाच फसवितात. त्यांना असे वाटत असते की, ते ‘योगमार्गा’चे अनुसरण करत आहेत. पण ते काही अंशीच साधना करत असतात आणि ते विरोधाभासाने भरलेले असतात.
…. मानसिक, प्राणिक वा शारीरिक आवडीनिवडी आणि पूर्वग्रहदूषित कल्पना या सर्वांगीण, परिपूर्ण प्रामाणिकपणाचे सर्वात मोठे शत्रू असतात. या अडथळ्यांवर मात केलीच पाहिजे.