इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
प्रामाणिकपणाची परीक्षा
माणसं वारंवार विचारतात की, ”त्यांना विरोधी शक्ती त्रास का देतात? विरोधी शक्तीला असा हस्तक्षेप करण्याचा अधिकार काय?” असा प्रश्न जेव्हा त्यांना पडतो, तेव्हा त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ती त्यांच्या प्रामाणिकपणाची परीक्षा असते. तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर काय होते? तर, तुमची चेतना झाकली जाते, त्यावर पडदा पडतो.
उदाहरणार्थ, जो माणूस खोटं बोलतो त्याची चेतना झाकली जाते आणि कालांतराने त्याला सत्य-असत्य यातील भेद जाणवेनासा होतो. तो कल्पनाचित्र पाहतो आणि त्यांनाच तो सत्य मानू लागतो. जो दुष्ट प्रवृत्तीचा आहे तो त्याची व्याकुळता गमावून बसतो. साक्षात्काराची क्षमता गमावून बसतो. आकलन, संवेदना आणि साक्षात अनुभूतीच्या सर्व शक्यता तो गमावून बसतो. हीच त्याला मिळालेली शिक्षा असते. एखादी व्यक्ती जेव्हा अप्रामाणिक असते, जेव्हा व्यक्ती दुरिच्छा बाळगते, जेव्हा ती कृतघ्न असते तेव्हा अशी व्यक्ती तत्काळ स्वतःच स्वत:ला शिक्षा करून घेत असते.