इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…हे उत्तम माध्यम असते
वाचन आणि अभ्यास यांचा मनाच्या तयारीसाठी उपयोग होत असला तरीदेखील, ‘योगमार्गा’त प्रवेश करण्यासाठीची ती स्वयंसिद्ध उत्तम अशी माध्यमे नव्हेत. अंतरंगातून होणारे आत्मार्पण हे उत्तम माध्यम असते. तुम्ही ईश्वराच्या चेतनेशी एकरूप झाले पाहिजे. मन, हृदय आणि ‘संकल्प’शक्ती यांमधील प्रामाणिक आत्मनिवेदन ही त्यासाठीची माध्यमे आहेत. दिलेले कर्म हे त्या आत्म-निवेदनासाठी नेहमीच उत्तम क्षेत्र असल्याचे मानले जाते. ईश्वराने दिलेले कर्म हे त्यांनाच अर्पण करण्याच्या भावनेतून केले गेले पाहिजे.