इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
याखेरीज दुसरा कोणताही समाधानकारक मार्ग नाही
सुव्यवस्था आणि तालबद्धता यांच्याविना भौतिक जीवन अस्तित्वात असू शकत नाही. जेव्हा ही व्यवस्था बदलली जाते तेव्हा व्यवस्थेतील बदल हा आंतरिक वृद्धीच्या अनुषंगानेच असला पाहिजे. केवळ काहीतरी वरवरची नूतनता हवी म्हणून तो बदल करता कामा नये. प्रकृतीच्या एका विशिष्ट भागाची धडपड ही फक्त बदलासाठी बदल आणि नूतनतेसाठी नूतनता मिळविण्याची असते. सातत्याने होणाऱ्या आतंरिक विकासामुळेच व्यक्तीला जीवनामध्ये नित्यनूतनता आणि अविरत रस आढळून येणे शक्य असते. याखेरीज दुसरा कोणताही समाधानकारक मार्ग नाही.