मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

समान नागरी कायदा नेमका काय आहे? त्याची अडचण कुणाला आहे? तो आल्यास काय होईल? घ्या जाणून सविस्तर..

by India Darpan
जून 21, 2023 | 5:28 am
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात सध्या समान नागरी कायद्याची जोरात चर्चा आहे. या कायद्यावर सूचना देण्याचे आवाहन २२व्या विधी आयोगाने सार्वजनिक व धार्मिक संघटनांना केले आहे. त्यावरून सरकारच्या विरोधात गोंधळ घातला जात आहे. या कायद्यात असे काय आहे की त्याची एवढी चर्चा होत आहे आणि काहींना अडचणही होत आहे?

२१ व्या विधि आयोगाने २०१८ मध्ये ‘कौटुंबिक कायद्यातील सुधारणा’ या विषयावर सल्लापत्र जारी केले होते. सध्या समान नगरी कायदा लागू करणे योग्य नाही. तसेच त्याची सध्या गरज नाही, असे आयोगाने म्हटले होते. तसेच प्रत्येक धर्मातील कौटुंबिक कायद्यांत सुधारणा करावी, असेही या आयोगाने सुचवले होते. विशेष म्हणजे हा कायदा लागू झाल्यास देशात विवाह, घटस्फोट, दत्तक घेणे, वारसा यासह अनेक खासगी बाबींमध्ये एकच कायदा लागू होईल. सध्या हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम अश्या सर्व धर्मांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. काही जमाती आणि जाती समूदाय कित्येक शतकांपासून त्यांच्या स्वतंत्र कायद्यांनी जगतात. हा कायदा लागू झाल्यास देशात एकच कायदा असणार आहे. त्यामुळे हा भाजपचा अजेंडा असल्याचे मत काँग्रेसने नोंदविले आहे.

वारसाहक्क, उत्तराधिकारी, दत्तक घेणे, पालकत्व या संदर्भात एक समान कायदा असावा, अशी मागणी घेऊन सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेसंदर्भातील सुनावणीदरम्यान ऑक्टोबर २०२२ मध्ये केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी समान नागरी कायदा असायला हवा, असे संविधानात नमूद केलेले आहे, असे सर्वोच्च न्यायालयासमोर सांगितले होते. तसेच देशात वेगवेगळ्या धर्म आणि संप्रदायाचे लोक संपत्ती आणि विवाहविषयक वेगवेगळे कायदे पाळतात, हे राष्ट्राच्या एकतेसाठी घातक आहे, असेही केंद्र सरकारने म्हटले होते. समान नागरी कायद्याचा प्रश्न २२ व्या विधि आयोगासमोर ठेवण्यात येईल, असेही तेव्हा सरकारने सांगितले होते. त्यानंतर आता आठ महिन्यांनंतर समान नागरी कायद्याच्या संहितेवर सूचना मागवण्यात आल्या आहेत.

काय आहे कायद्यात?
समान नागरी कायद्यांतर्गत विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक घेणे अशा खासगी बाबींमध्ये सर्वधर्मीय लोकांसाठी समान नागरी कायद्याच्या रूपात एकच कायदा अस्तित्वात असणार आहे. विवाह, घटस्फोट आदी बाबींमध्ये एखाद्या व्यक्तीचा धर्म, धार्मिक प्रथा याचा विचार न करता समान कायदा लागू होईल. सध्या भारतात प्रत्येक धर्माचे या संदर्भात स्वत:चे कायदे आहेत. हिंदू, शीख, जैन, बौद्ध धर्मीयांसाठी हिंदू विवाह कायदा लागू होतो. तर ख्रिश्चन, मुस्लीम धर्मीयांसाठी वेगळे कायदे आहेत.

लांबलचक प्रक्रिया
विधी आयोगाने सर्वधर्मीय संस्था तसेच नागरिकांना समान नागरी कायद्यासंदर्भात सूचना मागवल्या आहेत. त्यामुळे आयोगाच्या पत्रानुसार आता ३० दिवसांत सर्वांना या संदर्भात सूचना पाठवता येतील. सल्लामसलत, कागदपत्रे, चर्चा अशा कोणत्याही स्वरूपात आयोग सूचनांची नोंद करणार आहे. देशभरातून आलेल्या सूचनांचा अभ्यास करून आयोग पुन्हा एकदा समान नागरी कायद्यासंदर्भात शिफारशी किंवा निरीक्षणे मागवणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लांबलचक असणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोव्हिडच्या लसीमुळे हार्टअटॅक येतो? आयसीएमआर म्हणते…

Next Post

शिंदेंसोबत गेलेल्यांना भाजप त्रास देतोय का? बच्चू कडूंनी स्पष्टच सांगून टाकलं…

Next Post
bacchu kadu

शिंदेंसोबत गेलेल्यांना भाजप त्रास देतोय का? बच्चू कडूंनी स्पष्टच सांगून टाकलं...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011