इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर देशभर राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनीदेखील सावरकरांसंबंधी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली होती असा आरोप तुषार गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधींनी सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण तापलेले आहे. राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत, तर त्यांच्या या भूमिकेवर भाजपा मात्र आक्रमकपणे त्यांना लक्ष्य करत आहे. शिवसेनेनेही राहुल गांधींच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचे सांगितल्याने महाविकास आघाडीमध्येही फूट पडू शकते असा इशारा दिला आहे. आता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी एक ट्विट केले आहे.
तुषार गांधी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर नथुराम गोडसेलाही बापूंची हत्या करण्यासाठी एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी गोडसेकडे कोणतंही शस्त्र नव्हतं,” असा दावा तुषार गांधी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरु होताच त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपण कोणताही आरोप केला नसून, जे इतिहासात नोंद आहे तेच सांगितल्याचं ते म्हणाले आहेत. “मी कोणताही आरोप करत नसून, जे इतिहासात नमूद आहे तेच सांगितलं आहे.
पोलिसांच्या एफआयआरमध्ये नोंद आहे. त्यानुसार २६, २७ जानेवारी १९४८ च्या सुमारास नथुराम गोडसे आणि विनायक आपटे सावरकरांना भेटले होते. त्या दिवसापर्यंत नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती. बंदुकीच्या शोधात तो संपूर्ण मुंबईत फिरत होता. मात्र या भेटीनंतर ते थेट दिल्लीला आणि तेथून ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरला त्यांनी सावरकवादी असणाऱ्या परचुरेंची भेट घेतली. यानंतर त्यांना सर्वात चांगली पिस्तूल मिळवून दिली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी हे सर्व घडलं. हेच मी सांगितलं असून, नवीन काही आरोप केलेला नाही,” असं तुषार गांधी म्हणाले.
https://twitter.com/TusharG/status/1594047476016631809?s=20&t=utZGNXQ9PlBKgOpN-LJANg
Tushar Gandhi Big Statement on Svatantryaveer Savarkar
Mahatma Gandhi Nathuram Godse