बुधवार, डिसेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

GST विरोधात आता व्यापारी आक्रमक; एक दिवसीय भारत बंदची हाक

जुलै 10, 2022 | 2:08 pm
in संमिश्र वार्ता
0
gst

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जीवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्याने सर्वांनाच महागाईचा फटका बसत आहे. त्यातच आता जीएसटी परिषदेच्या नव्या धोरणामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच अन्नधान्यासह काही वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे महागाई आणखीनच वाढणार आहे. याप्रकरणी व्यापारी वर्गही नाराज असून जीएसटी परिषदेच्या या नव्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे, हा निर्णय मागे न घेतल्यास भारत बंदचा इशाराही व्यापारी संघटनांनी दिला आहे. या संदर्भात येथे  व्यापारांची बैठक झाली आहे. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

जीएसटी परिषदेने खाद्यान्न आणि अन्नधान्य ही जीएसटीच्या परिघात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्वसामान्यांना आवडणार नाही, पण आता त्याविरोधात महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनीही विरोध केला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी पुण्यात राज्यव्यापी व्यापारी परिषदेचे आयोजन केले होते. त्यात राज्यात व्यापा-यांची संघर्ष समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारने अन्नधान्यासह खाद्यांन्न वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास व्यापारी एक दिवसीय भारत बंद करावा, असा इशारा देण्यात आला आहे. या व्यापारी परिषदेत अनेक ठराव ही मंजूर करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू झाल्यास त्याचा भूर्दंड सर्वसामान्यांना तर बसेलच पण व्यापाऱ्यांना ही त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे व्यापा-यांनी हा निर्णय मागे घेण्याचा सरकारला अंतिम इशारा दिला आहे.

अन्नधान्यासह खाद्यान वस्तू आतापर्यंत करमुक्त होत्या. या वस्तूंवर व्हॅटही आकारण्यात येत नव्हता. पण जीएसटी परिषदेच्या नव्या शिफारशीनुसार, पॅकिंग केलेल्या आणि लेकल लावलेल्या डाळी- कडधान्ये, आटा, रवा, मैदा, दुग्धजन्य पदार्थांवर 5 टक्के जीएसटी लागू होईल. त्याचा फटका अर्थातच उत्पादक शेतकरी, वितरक व्यापारी आणि खरेदीदार ग्राहकांना बसणार आहे. यासाठी व्यापारी पंतप्रधानांना निवेदन देणार आहेत. तसेच या निर्णयाला विरोध म्हणून दि.१२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील प्रत्येक तालुका आणि जिल्हा पातळीवर प्रशासनाला तसेच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे देशभरात छोटे किराणादार जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचा व्यापार करतात. या वस्तूंवर जीएसटी लागू केल्यास तो भरावा लागेल. त्याचा सर्व हिशोब ठेवावा लागेल. त्यासाठी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी लागेल. मात्र हे छोट्या व्यापााऱ्यांना शक्य नाही. मग व्यापा-यासमोर त्याचा परंपरागत व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल.

जीएसटी कौन्सिलने चंदीगड येथील आपल्या ४७ व्या बैठकीत सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणाऱ्या आणखी वस्तू आपल्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेने प्री-पॅक केलेल्या खाद्यपदार्थांवर जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी पॅक केल्यावर धान्यासह अनपॅक न केलेल्या वस्तूंवरही त्याच दराने जीएसटी लागू होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जीएसटी दर पुनरावृत्तीनंतर महाग झालेल्या काही वस्तू खालीलप्रमाणे आहेत – पॅक केलेले मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, कोरडे सोयाबीन आणि मटार इ. यावर आता ५ टक्के जीएसटी लागणार आहे. तसेच चेक जारी करण्यासाठी बँकांकडून आकारले जाणारे शुल्क १८ टक्के जीएसटी लागू करेल. तर अॅटलससह नकाशे आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू होईल तसेच आणि प्रिंटिंग व ड्रॉइंग इंक’, शार्प नाइफ, पेपर कटिंग नाइफ आणि ‘पेन्सिल शार्पनर’, एलईडी दिवा, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादनांवर जीएसटी १८ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

Traders aggressive against GST rates hike Bharat Bandh Threat

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; या भागात अतिदक्षतेचा इशारा

Next Post

मालेगाव मध्ये पावसातही बकरी ईदची सामुदायिक नमाज पठण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
20220710 140940

मालेगाव मध्ये पावसातही बकरी ईदची सामुदायिक नमाज पठण

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011