रविवार, सप्टेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील कलाकारांना मालिका सोडणे कठीण; निर्मात्याने घेतला हा मोठा निर्णय

by Gautam Sancheti
ऑगस्ट 21, 2022 | 5:12 am
in मनोरंजन
0
tmkoc

 

अश्विनी भाटवडेकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अल्पावधीतच छोट्या पडद्यावर लोकप्रिय झाली. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, प्रेक्षकांना काय हवे हे ओळखून मालिकेची केलेली निर्मिती आणि यातील कलाकारांचा सकस अभिनय. पण, काही काळापासून या मालिकेतील अनेक कलाकार सातत्याने मालिका सोडून जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मालिकेच्या टीआरपीवर जरी काही परिणाम झाला नसला तरी प्रेक्षक नाराज होताना दिसत आहेत. या सगळ्या परिणामांची वेळीच दखल घेऊन मालिकेच्या निर्मात्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मालिकेतील कलाकारांसोबत एक कॉन्ट्रॅक्ट केले जाणार आहे. त्यानुसार हे कलाकार मालिका सोडून जाऊ शकणार नाहीत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली १४ वर्षे छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. इतक्या वर्षांत अनेक कलाकार ही मालिका सोडून गेले. मालिकेतील दयाबेन ही व्यक्तिरेखा साकारणारी दिशा वकानी देखील गेली. ती पुन्हा परतून आली नाही. तरीही या मालिकेची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. मात्र, अलीकडेच या मालिकेतील बरेच कलाकार एका पाठोपाठ एक मालिका सोडून गेले. आणि यामुळे मालिकेचे चाहते नाराज आहेत.

मालिकेचे निर्माता असित मोदी यांनी यावर एक तोडगा काढला आहे. मालिकेतील सर्व कलाकारांसाठी मोदी यांनी एक कॉन्ट्रॅक्ट तयार केले आहे. ज्यामुळे हे कलाकार मालिका सोडून जाऊ शकणार नाहीत. हे कॉन्ट्रॅक्ट योग्य आहे का आणि याची खरंच काही गरज होती का, याचे उत्तर मोदी यांनीच दिले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, प्रेक्षकांनी या मालिकेवर भरभरून प्रेम केलं. कारण या मालिकेतील व्यक्तिरेखा या केवळ याच कार्यक्रमापुरत्या मर्यादित होत्या. त्या अन्यत्र कुठेही दिसत नव्हत्या. त्यामुळे त्याचे एक वेगळे महत्त्व होते. पण, कलाकार मालिका सोडून जाऊ लागले आणि दुसऱ्या कार्यक्रमांमध्येही दिसू लागले. त्यामुळे सहाजिकच मालिकेचे महत्त्व कमी होणार.

View this post on Instagram

A post shared by TMKOC_Neela Film Productions (@taarakmehtakaooltahchashmahnfp)

ही मालिका म्हणजे माझ्यासाठी एक कुटुंब असल्याचे मोदी सांगतात. त्यामुळे या कुटुंबातून कोणीही लांब गेले की मला दुःख होते. या सर्वांना मी मालिकेत आणलं आहे. सगळ्यांनी सोबत राहून यशाचा आनंद घ्यावा एवढीच माझी इच्छा आहे. पण कोणाला सोबत राहायचे नसेल तर मी काय करू शकतो? अशी खंतही ते व्यक्त करतात. तारक मेहता यांची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी नुकतीच ही मालिका सोडली आहे. त्यांनी याविषयी काही माहिती दिली नसली तरी ते सध्या दुसऱ्या कार्यक्रमात दिसत आहेत. याबाबत मोदी म्हणतात की, कोणी मालिका सोडून गेल्याने कार्यक्रम काही थांबत नाही. जुने कलाकार आले तर त्यांचे स्वागतच आहे. नाही आले तर नवीन तर्क मेहता निश्चितच येतील.

TMKOC Show Entertainment Actors Left Producer
Tarak Mehta ka Ooltha Chashmah TV Serial Comedy

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लहानपणी केबीसीमध्ये करोडपती झाला; आज आहे मोठा पोलीस अधिकारी

Next Post

रतन टाटा हे महान का आहेत? हे वाचा, तुम्हाला नक्की कळेल…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

doctor
संमिश्र वार्ता

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

सप्टेंबर 7, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1
महत्त्वाच्या बातम्या

आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता या नावाने दिला जाणार….मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

सप्टेंबर 7, 2025
WhatsApp Image 2025 09 06 at 6.39.57 PM 1024x682 1
महत्त्वाच्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

सप्टेंबर 7, 2025
GANESH VISRJAN 4 1024x682 1
मुख्य बातमी

गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांचा गणरायाला निरोप… राज्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणुका शांततेत

सप्टेंबर 7, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने जपून चालवावी, जाणून घ्या, रविवार, ७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 7, 2025
accident 11
संमिश्र वार्ता

लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वीच मुख्य प्रवेशद्वाराजवळ अपघात…दोन चिमुकल्यांना चिरडून वाहनचालक फरार

सप्टेंबर 6, 2025
daru 1
संमिश्र वार्ता

परराज्यातील विदेशी मद्य वाहतूकप्रकरणी मोठी कारवाई…१ कोटी ५६ लाखाचा मुद्देमाल जप्त

सप्टेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना वाहन खरेदीचा योग, शनिवार, ६ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 6, 2025
Next Post
EFnH3TGXUAAkE p

रतन टाटा हे महान का आहेत? हे वाचा, तुम्हाला नक्की कळेल...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011