बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रिलायन्स जिओची ही जन्मकथा तुम्हाला माहीत आहे का?

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 1, 2022 | 5:21 am
in राष्ट्रीय
0
Reliance Jio Ambani1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही क्षेत्रात उद्योग व्यवसायामध्ये पाऊल ठेवायचे असेल तर खूप नियोजनाने विचार करावा लागते. अर्थात हा उद्योग व्यवसाय चालेल का? त्याची प्रगती होईल का? नेमके याचे ग्राहक कोण? बाजारपेठ कोणती? या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करावा लागतो. तरच तो उद्योग व्यवसाय यशस्वी होतो, असे म्हणतात. अर्थात नेमक्या कोणत्या उद्योग व्यवसायात पडावे , याचा सल्ला देणारे तज्ज्ञ तज्ञांचे मार्गदर्शक घेणे गरजेचे ठरते. परंतु एखाद्या मोठ्या उद्योजकाला या क्षेत्रात आपण पाऊल ठेवा ! असे सांगण्याचे धाडस कोण करत असेल. हे सांगणे कठीण आहे. परंतु खुद्द प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सुमारे सहा वर्षापूर्वी आपल्याला एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचे कोणी सुचविले याची माहिती दिली, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. कोण होते ती व्यक्ती?

अंबानी यांच्या रिलायन्स जिओने भारतीय टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवले आणि एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यांसह अन्य कंपन्यांचे चांगलीच धावपळ उडाली. कारण रिलायन्स जिओने अल्पावधीतच लाखो युझर्स मिळवले. याचा मोठा परिणाम टेलिकॉम क्षेत्रात क्रांतीकारक बदलांना सुरुवात झाली होती, याचा फटका अन्य कंपन्यांना मोठ्या प्रमाणात बसला. मात्र, जिओची आयडिया नेमकी कुणी दिली, याबाबत खुद्द मुकेश अंबानी यांनीच सन २०१८ मध्ये मुकेश अंबानी लंडन येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी तेथे जिओची जन्मकथा तिथे सांगितली कार्यक्रमात माहिती दिली.

वास्तविक रिलायन्स जिओला टेलिकॉम क्षेत्रात येऊन ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कंपनीचे वर्चस्व अजूनही बाजारावर कायम आहे. सप्टेंबर २०१६ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजने टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यानंतर भारताचे टेलिकॉम मार्केट पूर्णता बदलून गेले. एवढी क्रांती करणाऱ्या जिओची आयडिया कोणाच्या मनातून आली असेल, असा प्रश्न कोणाला नक्की पडू शकतो ? जिओची कल्पना त्यांना मुलगी ईशाने दिली होती. सन २०११ मध्ये ईशा अंबानीही येल विद्यापीठात शिक्षण घेत होती. सुट्यांच्या काळात ती घरी आली होती. तिला अभ्यासक्रमाविषयीचे काही अभ्यास करायचा होता. त्यावेळी त्यांनी येथील इंटरनेट अत्यंत वाईट असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याने कॉलिंग सेवेचे दिवस संपले असून आता इंटरनेटचा जमाना असल्याचे म्हटले होते. कारण सन २०११ मध्ये इंटरनेट अत्यंत कमी गतीने सेवा देत होते. तसेच महागडे असल्याने इंटरनेट हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. येथूनच जिओच्या जन्माचे नियोजन सुरु झाले.

त्यानंतर सन २०१६ मध्ये बाजारात दाखल झालेल्या जिओने बाजारात धमाल केली. अवघ्या सहा वर्षांत टेलिकॉम बाजार बदलून टाकला. कंपनीने त्यांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग आणि एसएमएस सेवा दिली आणि डेटावर लक्ष्य केंद्रित केले. इतकेच नव्हे, तर आता जिओ लवकरच 5G सेवाही सुरू करत आहे. खरे तर जियो बाजारात येण्यापूर्वी केवळ कॉलिंग सुविधेवर कंपन्या जोर देत होत्या. जिओमुळे कंपन्या डेटावर भर देऊ लागल्या. टेलिकॉम मार्केटमध्ये धमाका करुन ६ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या कंपनीची जादू अजूनही बाजारावर कायम आहे. ५ सप्टेंबर २०१६ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजने टेलिकॉम बाजारात पाऊल ठेवले होते. त्यानंतर भारताचं टेलिकॉम मार्केट पूर्णता बदलून गेले. कारण भारतात जिओ येण्यापूर्वीही सोशल मीडियाचा वापर होत होता. परंतु, जिओने बाजारात जोरदार धडक दिली.

कॉलिंगऐवजी कंपनीने डेटा प्लॅनवर लक्ष्य केंद्रित केले. डेटा प्लॅन अगदी स्वस्त केला. त्यामुळे समाज माध्यमांचा वापर करणे नागरिकांना सहज सोपे झाले. बाजारात कंपनीने चांगला दबदबा तयार केला. पण इतर कंपन्यांच्या दबावामुळे कंपनीला फ्री कॉलिंग सेवा बंद करावी लागली. त्यात भारतीय ग्राहकांचे मोठे नुकसान झाले होते. एकंदरीत टेलिकॉम क्षेत्रात जिओचा धबधबा अद्यापही कायम आहे यामागे अनेकांचे योगदान असले तरी संकल्पना कोणाची आहे हे आता आपल्याला निश्चितच कळले असेल.

Telecom Reliance Jio Birth Story Mukesh ambani
Industry

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राजकीय स्थितीवरुन दुकानात सुरू होती चर्चा… जोरदार भांडणानंतर एकाचे डोकेच फोडले

Next Post

सावधान! …तर आजपासून तुमचे डिमॅट अकाऊंट होणार बंद

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Dmat Account

सावधान! ...तर आजपासून तुमचे डिमॅट अकाऊंट होणार बंद

ताज्या बातम्या

Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011