इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आयटी क्षेत्रातील मूनलायटींगचे धडाके आता चांगलेच दिसून येत आहेत. विप्रो कंपनीने तब्बल ३०० कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर आता प्रख्यात टीसीएस कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. त्याची सध्या देशभरात चर्चा होत आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने घरून काम करण्याची सवय झालेल्या कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. टीसीएसने अंतर्गत मेलमध्ये म्हटले आहे की, कोरोनानंतर परिस्थिती सामान्य झाली आहे आणि आता आठवड्यातून ३ दिवस कार्यालयात येणे बंधनकारक आहे. त्याचे पालन न केल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल. आयटी कंपन्यांना सध्या मूनलायटींगचा प्रश्न भेडसावतो आहे. म्हणजेच कर्मचारी वर्क फ्रॉम होमद्वारे अन्य कंपन्यांची कामे करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. एकाच वेळी इतर मार्गांनी कर्मचारी पैसे कमवित आहेत. त्यामुळे आयटी कंपन्या नाराज आहेत. यामुळे विप्रोनेही ३०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.
कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमधून काम करण्यासाठी कंपनीने ईमेल पाठविला आहे. ईमेलनुसार रोस्टर निश्चित करण्यात येणार असून त्यानुसार कर्मचाऱ्यांना कंपनीत यावे लागणार आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही टाइमलाइन दिली नसली तरी, अधिक तपशीलांसाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या एचआरशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. यापूर्वी टीसीएसने कर्मचाऱ्यांना कार्यालयातून कामाला लावण्यासाठी सोशल मीडियावर प्रचार केला होता. TCS ने प्रचारात ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे.
TCS IT Company Moonlighting Effect Order
IT Industry Employee
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/