इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याच्या काळात शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असताना टाटा समूहातील एका कंपनीच्या शेअरमध्ये मात्र गुंतवणूकदारांना चांगला लाभ झाला आहे, असे दिसून येते. कारण टाटा समूहाच्या या कंपनीच्या समभागांनी घसघशीत परतावा दिला आहे. टाटा समूहाची ही कंपनी Tata Elxsi आहे.
Tata Elexi च्या समभागांनी गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना जवळपास 50,000 टक्के परतावा दिला आहे. विशेष म्हणजे या कालावधीत कंपनीचे शेअर्स 17 रुपयांवरून 8600 रुपयांपर्यंत वाढले आहेत. Tata Elexi च्या समभागांनी या वर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना 47 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 9,420 रुपये आहे.
Tata Elxsi चे शेअर्स 21 सप्टेंबर 2001 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 17.55 रुपयांच्या पातळीवर होते. 6 जून 2022 रोजी कंपनीचे शेअर्स NSE वर 8,680 रुपयांवर बंद झाले आहेत. टाटा अलेक्सीच्या समभागांनी या कालावधीत गुंतवणूकदारांना जवळपास 50,000 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 21 सप्टेंबर 2001 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर सध्या ही रक्कम 4.95 कोटी रुपयांच्या जवळपास गेली असती.
Tata Elexi च्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षात गुंतवणूकदारांना 1,027 टक्के परतावा दिला आहे. 9 जून 2017 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर Tata Elexi चे शेअर्स 770 रुपयांच्या पातळीवर होते. 6 जून 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 8,680 रुपयांवर बंद झाले. जर एखाद्या व्यक्तीने 9 जून 2017 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर सध्याची रक्कम 11 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती.
(महत्वाची सूचनाः शेअर बाजारात गुंतवणूक करणे अतिशय जोखमीचे आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ला घेऊनच योग्य तो निर्णय घ्यावा)