बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धर्मांतरणाचा प्रश्न अतिशय गंभीर, त्याला राजकीय रंग देऊ नका – सर्वोच्च न्यायालय

by India Darpan
जानेवारी 9, 2023 | 5:42 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
SC2B1

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धर्मांतर हा गंभीर मुद्दा असून त्याला राजकीय रंग देऊ नये, अशी परखड टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. प्रलोभन दाखवून सक्तीच्या धर्मांतरावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी यांच्याकडून उत्तर मागितले आहे. धमकावून, लालूच दाखवून किंवा विविध फायदे देऊन धर्मांतरावर बंदी घालावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती एमआर शाह आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी यांना सांगितले की, आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की धर्मांतरे बळजबरीने किंवा लालसेने होत आहेत आणि असे होत असल्यास आम्ही काय करावे? आणि ते सुधारण्यासाठी काय केले पाहिजे. याबाबत केंद्राने स्पष्टता करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

तामिळनाडू सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील पी. विल्सन यांनी ही याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. तामिळनाडूमध्ये अशा धर्मांतराचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आक्षेप घेत सांगितले की, “न्यायालयातील सुनावणी इतर प्रकरणांकडे वळवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या राज्यात असे घडत असेल तर ते वाईट आहे आणि जर तसे होत नसेल तर ते वाईट आहे, आम्हाला संपूर्ण देशाची काळजी वाटते. असेल तर चांगली गोष्ट आहे. एखाद्या राज्याला लक्ष्य म्हणून पाहू नका. त्याला राजकीय बनवू नका.”

अधिवक्ता अश्विनी कुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना फसव्या किंवा जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. बळजबरीने होणारे धर्मांतर देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच केंद्राला या गंभीर मुद्द्यावर कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. गुजरात सरकारने विवाहासाठी धर्मांतर करण्यापूर्वी जिल्हा दंडाधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य करणारा कायदा केला होता. मात्र, गुजरात उच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती दिली होती. ही स्थगिती हटवण्यासाठी गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यादरम्यान गुजरात सरकारने म्हटले होते की धर्म स्वातंत्र्यामध्ये धर्मांतराचा अधिकार समाविष्ट नाही.

सक्तीचे धर्मांतर ही संपूर्ण देशाची समस्या असून त्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे याचिकेत म्हटले आहे. याचिकेत न्याय आयोगाने एक अहवाल आणि विधेयक तयार करण्याची मागणीही करण्यात आली आहे, ज्यामध्ये धर्मांतराच्या घटनांना धमकावून किंवा लालूच दाखवून नियंत्रित करता येईल. आता सर्वोच्च न्यायालयात ७ फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Supreme Court on Religious Conversion Petition
political Legal Serious

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गॅस सिलिंडरचा स्फोट; घरावरील पत्रे उडाले, आईसह तीन मुले गंभीर जखमी

Next Post

अखेर केंद्र सरकारने निर्णय घेतला! आता सर्वच मोबाईलला असणार एकच चार्जर; एक देश, एक चार्जर…

India Darpan

Next Post
Mobile Charger scaled e1673268129805

अखेर केंद्र सरकारने निर्णय घेतला! आता सर्वच मोबाईलला असणार एकच चार्जर; एक देश, एक चार्जर...

ताज्या बातम्या

modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011