मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी बँका असो की खासगी बँका, आपल्या कर्जाच्या व्याज दरात वाढ करत असतात साहजिकच त्याचा फटका कर्जदार ग्राहकांना बसतो, सध्या देखील अशाच एका मोठ्या बँकेने कर्जाचे व्याज दर वाढविल्याने सर्वसामान्य कर्जदार ग्राहकांना याचा मोठा फटका बसला आहे. असे दिसून येते. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना झटका दिला. बँकाने बेस रेट वाढवला आहे. त्यामुळे ईएमआय वाढणार आहे अथवा ग्राहकांना ईएमआय तोच ठेवण्यासाठी कर्ज कालावधी वाढवावा लागणार आहे.
एसबीआय बँकेने बेस रेट वाढवल्याने बँक ग्राहकांना थेट फटका बसला आहे. बेस रेट वाढल्याने व्याजदर पूर्वीपेक्षा महाग होतील, त्यामुळे कर्जदारांना जास्त व्याज द्यावे लागणार आहे. बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे दर वाढले आहेत. आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागत आहे. एसबीआयने बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेटमध्ये (BPLR) ७० आधार अंकांची म्हणजे ०.७ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे बेस रेटमध्ये ही ७० आधार अंकांची वाढ झाली. BPLR आता वार्षिक १३.४५ टक्के तर बेस रेट ८.७० टक्के असेल. बँकेने यापूर्वी १५ जून रोजी हे दर वाढविले होते.
बँक कर्जाचे व्याज फक्त बेस रेटच्या आधारे ठरवले जाते. बँकेचा बेस रेट हा किमान दर आहे, ज्यापेक्षा कमी कोणतीही बँक कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला कर्ज देऊ शकत नाही. बेस रेट म्हणजे बँक आपल्या ग्राहकांसाठी लागू करते तो दर. किंवा असेही म्हणता येईल की, व्यावसायिक बँका ग्राहकांना ज्या दराने कर्ज देतात, तोच बेस रेट होय.
फ्लोटिंग दराने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. त्यांच्या कर्जावरील हप्ता वाढेल. वाढलेल्या व्याजदराची रक्कम त्यांच्या ईएमआय मध्ये समाविष्ट होईल. त्यामुळे हप्ता वाढेल. काही ग्राहक हप्त्याचा भार वाढू नये यासाठी कर्ज कालावधी वाढवू शकतात. तसेच ज्यांनी जुलै २०१० आणि मार्च २०१६ यादरम्यान फ्लोटिंग रेट आधारे गृहकर्ज घेतले आहे. त्यांना या व्याजदर वाढीचा फटका बसणार आहे.
बेंचमार्क हा व्याज दरांवर परिणाम करणारा मानक दर आहे. या दरांमुळे कर्ज प्रकरणातील व्याजांचे दर निश्चित करण्यात येतात. बँकेने बेस रेट वाढवल्याचा थेट परिणाम एसबीआयच्या ग्राहकांवर होणार आहे. बेस रेट वाढल्याने व्याजदर पूर्वीपेक्षा महाग होतील, ज्यामुळे कर्जदारांना जास्त व्याज द्यावे लागणार आहे. बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे दरही वाढणार आहेत. तसेच ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे.
State Bank of India Decision Customer Effect