नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फुले दांपत्याच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यासाठी फुले चित्रपट अतिशय महत्वाचा असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यांनी केले.
महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने नाशिकच्या सिटी सेंटर येथील चित्रपट गृहात फुले चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी या शो चे आयोजन केले होते.
यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, डॉ.शेफाली भुजबळ, प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, शहराध्यक्षा कविताताई कर्डक,महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे, कार्याध्यक्षा जयश्री काठे, समाधान जेजुरकर, आशा भंदूरे, रवी हिरवे, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, नाना साबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित याआधी मराठी चित्रपट प्रदर्शित झालेले आहे. आचार्य अत्रे यांनी काढलेल्या महात्मा फुले यांच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता प्रथमच हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे देशभरात तसेच देशाबाहेर देखील हा चित्रपट बघितला जाईल त्यातून इतिहास समाजापर्यंत पोहचेल. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पाहणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की स्त्री शिक्षणा सोबतच बालहत्या प्रतिबंध, केशवपण परंपरेला विरोध यासह अनेक महत्वाच्या सामाजिक सुधारणा फुले दांपत्याने केल्या. ज्यावेळी समाजातून तीव्र विरोध होत असताना त्यांनी हा विरोध झुगारून सामाजिक क्रांतीचे पाऊल टाकले. आज परिस्थिती बदलली आहे. मात्र त्या काळातील इतिहास सर्व समाजापर्यंत जाणे तितकेच आवश्यक आहे. इतिहासाचा अभ्यास केला तरच पुढील वाटचाल ही अधिक सुकर होत असते. त्यामुळे हा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्र सरकार राफेल मरीन प्रकारच्या २६ लढाऊ विमानांची खरेदी करणार असून त्यासाठी आज फ्रान्सबरोबर संरक्षण करार होणार आहे. संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी आणि भारतातले फ्रेंच राजदूत यांच्या उपस्थितीत संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या होतील.
भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह हे भारताचं प्रतिनिधित्व करतील. या २६ विमानांपैकी २२ सिंगल सीटर प्रकारची तर उर्वरित ४ डबल सीटर प्रकाराची विमानं आहेत. भारतीय नौदलाच्या गरजेनुसार या विमानांची रचना असेल. ही विमानं भारतीय नौदलाच्या विक्रांत आणि विक्रमादित्य या युद्धनौकांवर तैनात केली जातील.