इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असतांना दोन महिन्यापूर्वी राज्याचे मंत्री धनजंय मुंडे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारला. त्यानंतरही धनजंय मुंडे यांची पाटी आजही मंत्रालयात असल्यामुळे त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थितीत केला आहे.
दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्यात म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि तो स्वीकारला देखील गेला मग अजूनही मंत्रालयात त्यांच्या नावाचे कार्यालय कशासाठी? आणि मंत्री म्हणून पाटी कशासाठी? असे म्हटले आहे.
संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडसह ७ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या दिवशी मंत्री धनजंय मुंडेचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतरही मंत्रालयात पाटी कायम आहे. या पाटीबरोबरच हे दालनाही रिक्त ठेवण्यात आले आहे. मंत्रीपदाचा राजीनामा झाल्यानंतर तात्काळ नावाच्या पाट्या हटवल्या जातात. मात्र ही वेगळी भूमिका का घेण्यात आली याबाबत आता प्रश्न उपस्थितीत केले जात आहे.