मुंबई – लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसशिवाय देशातील विरोधी पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करण्याचे आणि त्याचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहणार्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शिवसेनेकडून उत्तर मिळाले आहे. काँग्रेसला बाजूला सारून भारतीय जनता पार्टीसमोर बळकट विरोधी पक्ष उभा करण्याचे प्रयत्न करणार्या ममता बॅनर्जी यांना शिवसेनेने स्पष्ट शब्दात सांगितले की काँग्रेसविना विरोधी पक्षांची आघाडी बनविणे भाजपलाच भक्कम करण्यासारखे ठरेल. काँग्रेसरूपी उतरणार्या वाहनाला वर चढू न देणे आणि काँग्रेसच्या जागी आपल्याला बसायचे हा हेतू घातक आहे, असे म्हणत शिवसेनेने मुखपत्र सामनाच्या संपादकीयमध्ये ममता बॅनर्जीवर निशाणा साधला आहे.
सामनाच्या संपादकीयनुसार, ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौर्यामुळे विरोधी पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कमीत कमी शब्दांचे बाण तरी हवेत सुटत आहेत. भाजपसमोर बळकट विरोधीपक्ष उभा करण्याविषयी एकमत आहे. परंतु कोणी कोणाला सोबत घ्यावे अथवा बाहेर ठेवावे यावरून विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. विरोधी पक्षांच्या एकतेचा किमान समान कार्यक्रम तयार झाला नाही तर भाजपला सामर्थ्यवान पर्याय देण्याबद्दल कोणीच बोलू नये. आपापले राज्य आणि तुटलेले-फुटलेले किल्ले सांभाळत बसायचे की एकत्र यायचे यावर कमीतकमी एकमत होणे आवश्यक आहे. या एकतेचे नेतृत्व कोण करणार हा राहिला पुढचा मुद्दा. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी वाघिणीसारख्या लढल्या आणि जिंकल्या. बंगालच्या भूमिवर त्यांनी भाजपला धूळ चारली आहे. त्यांच्या संघर्षाला देशाने नमन केला आहे.
ममता यांच्या राजकीय दृष्टीकोनावर टीका करताना संपादकीयमध्ये म्हटले की, ममता यांनी मुंबईत येऊन राजकीय भेट घेतली. ममता यांचे राजकारण काँग्रेस उन्मुख नाहीय. पश्चिम बंगालमधून त्यांनी काँग्रेस, डावे आणि भाजपचा सुपडा साफ केला आहे. हे खरे असले तरी काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणापासून दूर ठेवून राजकारण करणे म्हणजे सध्याच्या फॅसिस्ट राजची प्रवृत्ती बदलण्यासारखी आहे. काँग्रेसचा सुपडा साफ व्हावा असे मोदी आणि भाजपला वाटणे समझू शकता येते. हा त्यांच्या कार्यक्रमाचा अजेंडा आहे. परंतु मोदी आणि त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणार्यांना सुद्धा काँग्रेस संपावी असे वाटणे हा गंभीर धोका आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये काँग्रेसची झालेली पिछेहाट चिंताजनक आहे. यावर कोणाचेही दुमत असू शकत नाही. तरीही उतारावरील गाडीला वर चढू न देणे आणि काँग्रेसच्या जागी आपल्याला बसविणे हा हेतू घातक आहे. काँग्रेसचे दुर्दैव इतके आहे की ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसकडून सुख-सत्ता प्राप्त केली. तेच लोक आज काँग्रेसचा गळा घोटत आहेत. गुलाम नबी आझाद यांनी २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती चांगली नसेल असा शाप दिला आहे.
काँग्रेसची आजच्यासारखीच परिस्थिती कायम राहिली तर अवस्था निराशाजनक असेल, असे ते म्हटले होते. आझाद वगैरे मंडळींनी जी२३ नावाची असंतुष्टांचा एक गट तयार केला आहे. या गटातील बहुतांश सर्व लोकांनी काँग्रेसकडून सत्ता-सुख उपभोगले आहे. परंतु याच गटाच्या तेजस्वी मंडळाने काँग्रेसची आजची स्थिती सुधारण्यासाठी काय प्रयत्न केले? जे भाजपला वाटते तेच या मंडळींनाही वाटते याला योगायोगच म्हटले जाऊ शकते.
ज्यांना दिल्लीतील राजकीय व्यवस्था खरीच नको आहे. त्यांनी यूपीचे सशक्तीकरण करण्याचे लक्ष्य ठेवावे. काँग्रेसशी ज्यांचे मतभेद आहेत, ते कायम ठेवूनही यूपीएची गाडी पुढे नेली जाऊ शकते. अनेक राज्यांमध्ये काँग्रेस आजही आहे. गोवा, ईशान्येकडील राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेसने काँग्रेसचे खच्चीकरण केले. परंतु त्यामुळे टीएमसीचे फक्त दोन-चार खासदार वाढले. आम आदमी पक्षाचेही तेच हाल आहेत. काँग्रेसला दाबणे आणि स्वतः वर चढणे हीच सध्याच्या विरोधी पक्षांची चाणक्यनीती आहे. काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही, असे मत तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे. राजकीय घराण्यांचे किल्ले पाहता पाहता उद्ध्वस्त होतात.
म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट नाही
ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौर्यादरम्यान त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार होत्या. परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यांच्याऐवजी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी ममता यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेनेला ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय स्तरावर पाहण्याची इच्छा नाही, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु नंतर शिवसेना प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली की, उद्धव ठाकरे यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली आहे त्यामुळे ते प्रकृतीच्या कारणामुळे ममता बॅनर्जी यांना भेटू शकले नाही, त्यामुळे चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.