बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

समृद्धी महामार्गावर खुला होताच अपघातांची मालिका; बघा, कुठे किती झाले अपघात?

by India Darpan
डिसेंबर 18, 2022 | 5:18 am
in संमिश्र वार्ता
0
samruddhi mahamarg

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे (नागपूर ते शिर्डी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या मार्गामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होत आहे. मात्र, या महामार्गावर अपघातांचीही मालिका सुरु झाली आहे. एकट्या  बुलढाणा जिल्ह्यातच पाच दिवसांमध्ये पाच ठिकाणी अपघात झाले आहेत.

समृद्धी महामार्गाच्या सुरुवातीलाच म्हणजे वायफळ टोलनाक्याजळच हा पहिला अपघात झाला. एका कारला मागून येणाऱ्या भरधाव कारने टोलनाक्याजवळ धडक दिली. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळाकडे धाव घेतली.धडक देणाऱ्या कारचा समोरच्या बाजूचा चक्काचूर झाला. त्यानंतर मेहकर बेलगाव येथील डोणगाव हद्दीतील अपघाताची दुर्घटना झाली. कारण गॅस सिलिंडरने भरलेला हा ट्रक होता ,त्यामुळे ट्रक उलटल्यावर कुठलीही मोठी दुर्घटना होऊ शकली असती, सिलिंडरचा स्फोट होऊ शकला असता मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र सतत होणारे हे अपघात मात्र चिंतेची बाब असल्याचे समोर येत आहे.

नेमके हे अपघात का होता आहेत, अपघाताची नेमकी कारणे काय आहेत? याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. वास्तविक विदर्भ आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात समृद्धी येईल, असं म्हटले जात आहे. पण याठिकाणी १२० किमी प्रतितासाची वेग मर्यादा असल्यानं यावर फक्त याच वेगात वाहने चालविण्याची मुभा आहे. अतिशय सरळ रेषेत हा महामार्ग असल्याने आणि गुळगुळीत रचना असल्यामुळे वाहन चालकाला आपण निर्धारित वेग मर्यादेच्या पलीकडे गेलो, हे लक्षातच येत नाही. त्यामुळे या महामार्गावर गेल्या पाच दिवसात अनेक अपघात झाले.

केवळ पाच दिवसांत फक्त बुलढाण्यातच पाच अपघात झाले आहेत. मालवाहू ट्रक अनियंत्रित होऊन मेहकरजवळ महामार्गावरील कठड्यावर आदळून पलटी झाला, चालक जखमी झाला. पुन्हा त्यानंतर १२ डिसेंबरलाच एक गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन महामार्गाच्या खाली खोल खड्ड्यात उलटला, चालक आणि वाहक जखमी झाले. पुन्हा १५ डिसेंबर रोजी रात्री एक कार शिर्डीहून अमरावती कडे जात असताना चालकाला झोप लागल्याने कठड्याला धडकून अपघात झाला, यात बाळांसह तिघे गंभीर जखमी झाले.
त्यानंतर १६ डिसेंबरला दोन वेगवेगळे झाले .पहिला अपघात हा एक कार औरंगाबादहुन मेहकरकडे जाताना रस्त्यावर अचानक कोल्हा आला आणि कार अनियंत्रित होऊन अपघात झाला, दोन गंभीर जखमी, एकजण किरकोळ जखमी झाला. तर याच दिवशी दुसरा अपघात मुंबईहून एक कार वर्धा कडे जाताना मेहकर नजीक चालकाला झोप आल्याने कार कठड्याला धडकून अपघात , चालक गंभीर जखमी झाला.

समृद्धी महामार्ग सरळ रेषेत असल्याने आणि वाहन चालवताना वाहन चालकाला तंद्री लागण्याची अवस्था निर्माण झाल्याने चालकाला आपण किती वेगात जातो, याचे भानच राहत नाही, त्यामुळे अचानक झोप किंवा डुलकी लागू शकते. असे प्रकार या महामार्गाच्या रचनेमुळे होत आहेत. शिवाय अचानक महामार्गावर जंगली प्राणी येणे आणि त्यामुळे वाहनावरचं नियंत्रण सुटणे अशा अनेक कारणाने महामार्गावर अपघात होत आहेत.

देशातील वाढत्या वाहन अपघातांबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः वाहनचालकांमध्ये वाहन चालविताना जनजागृती हवी, तसेच वाहनांची योग्य दुरुस्ती व वेळोवेळी देखभाल देखील व्हायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या देशातील वाहन चालकांमध्ये पाहिजे तशी जागृती झालेली नाही. त्यामुळे यापुढे समृद्धी महामार्गावरून वाहन चालवतानाच मोठी जनजागृती करणे आवश्यक आहे, असे म्हटले जात आहे.

Samruddhi Mahamarga Highway Accidents
Nagpur Mumbai

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुण्यात येणार तब्बल १० हजार कोटींची गुंतवणूक; इलेक्ट्रिक कारची होणार निर्मिती

Next Post

देशातील या ७ मार्गांवर धावणार हायस्पीड रेल्वे; केंद्र सरकारची जय्यत तयारी

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

देशातील या ७ मार्गांवर धावणार हायस्पीड रेल्वे; केंद्र सरकारची जय्यत तयारी

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011