जयपूर (राजस्थान) – सामाजिक कार्यकर्ते असो की आरटीआय कार्यकर्ते समाजाच्या हितासाठी कार्य करतात. परंतु कधीकधी अशा कार्यकर्त्यांना काही समाज विघातक प्रवृत्तीच्या व्यक्ती त्यांच्यावर हल्ला करतात किंवा त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील देतात. असेच एक प्रकरण राजस्थान मध्ये घडले.
राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील गिडा हद्दीतील चिमणी येथील ग्रामपंचायतीमध्ये पसरलेला भ्रष्टाचार व दारू माफियां विरोधातील आरटीआय एका कार्यकर्त्यावर जीव घेणा हल्ला झाला. काही बदमाशांनी आधी कामगार तथा कार्यकर्ता याचे अपहरण केले आणि नंतर त्याला मारहाण केली. हल्लेखोरांनी प्रथम त्याच्या पायावर सळ्यांनी हल्ला करून त्याचे पाय तोडले आणि नंतर पायात लोखंडी खिळे मारले.
याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अमरराम असे या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे. एका कारमध्ये आठ हल्लेखोर आले आणि त्यांनी त्यांचे अपहरण करून कुंपलिया गावात नेले आणि निर्जन ठिकाणी नेऊन त्याला बेदम मारहाण केली. सर्वात वाईट कृत्य म्हणजे त्याला लघवी (मूत्र) देखील पाजण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एका पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले आले आहे.
अमराराम यांच्यावर जोधपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. बाडमेरचे पोलिस अधीक्षक (एसपी) दीपक भार्गव यांनी सांगितले की, भूपेंद्र, खरताराम, आदेश आणि रमेश या चार जणांना घटनेच्या संदर्भात अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. अज्ञात हल्लेखोरांनी आरटीआय कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला केला, तसेच अमरारामने तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकीही या हल्लेखोरांनी दिली. पोलीस तक्रारीत अमराराम यांनी सांगितले की, माजी सरपंच, विद्यमान सरपंच नेमाराम लखारा, दारू ठेकेदार, परेऊ यांच्याविरुद्धचा आरटीआय परत घ्या नाहीतर तुम्हाला जीवे मारतील, असे बदमाशांनी सांगितले. सध्या आरोपींविरुद्ध तपास सुरू आहे.