गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एकनाथ शिंदेंची बंडखोरी फसणार? गटात घडताय नाट्यमय घडामोडी

by Gautam Sancheti
सप्टेंबर 3, 2022 | 10:58 am
in मुख्य बातमी
0
cm eknath shinde 1 e1704958478974

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेतून बंडखोरी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. सरकार स्थापन होऊन जेमतेम दीड महिन्यांचा कालावधी लोटला असतानाच आता त्यांना त्यांच्या गटातील आमदारांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच शिंदे गटात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे बोलले जात आहे.

बंडखोर आमदारांच्या नाराजी नाट्यामुळे शिंदे यांना मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार करता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. बहुतांश बंडखोरांना शिंदे सरकारमध्ये स्वत:ला मंत्री म्हणून पाहायचे आहे आणि त्यामुळेच अडचण निर्माण झाली आहे. सध्या खरी शिवसेना आणि बनावट शिवसेना असाही वाद सुरू आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. अशा स्थितीत मंत्रिपद न मिळाल्यास काही आमदार उद्धव ठाकरे गटासोबत जाऊ शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. तसे झाले तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी फार अवघड होणार आहे.

काही बंडखोर फुटले तरी..
शिंदे गटातील काही आमदार गेले तरी एकनाथ शिंदे गटाला पक्षांतर विरोधी कायद्याचा धोका निर्माण होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड करून सरकार स्थापन केले तेव्हा त्यांना ४० आमदारांचा पाठिंबा मिळाला. शिवसेनेचे एकूण ५४ आमदार आहेत. अशा परिस्थितीत पक्षांतर विरोधी कायदा टाळण्यासाठी वाद मिटत नाही तोपर्यंत किमान ३७ आमदारांनी शिंदेंसोबत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांपैकी ४ आमदारही वेगळे झाले तर ही संख्या ३६ पर्यंत कमी होऊन पक्षांतर कायदा लागू होण्याची भीती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांची ही अडचण असल्याने ते आमदारांचे मन वळविण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत.

शिंदे गटाचे सदस्य म्हणाले की, “सध्या हा संपूर्ण वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याशिवाय दोन्ही पक्षांची याचिकाही निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. मात्र अशावेळी मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि मंत्रिपद न मिळालेले नेते उद्धव यांच्याकडे गेले तर खऱ्या शिवसेनेवरील हक्काचा आधारच कमकुवत होईल. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे गटातील ४० पैकी केवळ ९ आमदार मंत्री झाले आहेत. अशा स्थितीत शिवसेनेविरुद्ध बंडखोरी करून त्यांना काय मिळाले याबाबत उर्वरित जनतेत असंतोष आहे. याशिवाय एकीकडे शिवसेनेशी बंडखोरी केल्यामुळे त्यांची निवडणूक धोक्यात येऊ शकते आणि दुसरीकडे त्यांना मंत्रिपदासारखे लाभ मिळू शकलेले नाहीत, तर बंडखोरीचा काहीच फायदा होणार नाही. असा विचार आता बंडखोर आमदारांमध्ये सुरू आहे.

एकनाथ शिंदे हे आता जास्तीत जास्त २३ आमदारांना मंत्री बनवू शकतात. मात्र, त्यांच्या गटातील सर्व ३१ आमदारांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे. याशिवाय भाजपलाही कोट्यात ठेवावे लागणार आहे. अशा स्थितीत आमदारांना कसे शांत करायचे, हा एकनाथ शिंदे यांच्यासमोर चिंतेचा विषय आहे. किंबहुना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे भाजपचाही डोळा असून त्यांच्या आमदारांची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत त्यांना आणखी मंत्रीपदे हवी आहेत. याशिवाय छोट्या पक्षांचे आमदारही मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे दिवसागणिक हा पेच वाढत असून यापुढील काळात नक्की काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Rebel Leader CM Eknath Shinde Big Challenge MLA
Shivsena Devendra Fadanvis BJP Uddhav Thackeray

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला-३४: श्रीअरविंद- क्रांतिकारक ते महायोगी: प्रभाव क्षेत्राचा साक्षात अनुभव

Next Post

गणेशोत्सवानिमित्त नाशिक शहरात धावणार जादा बसेस; असे आहे नियोजन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

VIRENDRA DHURI
संमिश्र वार्ता

‘ओबीसी’ महामंडळांना निधी वाटपात भेदभाव होणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

सप्टेंबर 11, 2025
sushila kargi
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की? अंतरिम सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु

सप्टेंबर 11, 2025
G0e W1lXkAAWJGD
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रव्यापी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक…झाले हे निर्णय

सप्टेंबर 11, 2025
G0f9gZ0aYAAJPQC e1757556321796
मुख्य बातमी

आशिया कपमध्ये भारताची सलामी…पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने यूएईच्या संघाचा ९ विकेट्सने केला पराभव

सप्टेंबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
Next Post
Nashik city bus 7

गणेशोत्सवानिमित्त नाशिक शहरात धावणार जादा बसेस; असे आहे नियोजन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011