मंगळवार, नोव्हेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अंध सासऱ्यांच्या सेवेत फुलवली निर्यातक्षम द्राक्ष शेती; रत्नबाई अपसुंदे यांची जबरदस्त यशोगाथा

सप्टेंबर 27, 2022 | 11:36 am
in स्थानिक बातम्या
0
20220927 113403

 

पतीची सरकारी नोकरी असलेल्या ठिकाणी २० वर्षे निवास करूनही रत्नाबाई अपसुंदे या आपल्या अंध सासऱ्यांच्या सेवेसाठी गावाकडे आल्या. गावी येऊन घरची जबाबदारी पार पाडत शेतीत स्वत:चं अस्तित्व निर्माण करणार्‍या रत्नाबाई अपसुंदे यांचा प्रवास आज जाणून घेणार आहोत

पाडेगाव (ता. दिंडोरी) येथील बाबुराव अपसुंदे यांच्याशी १९७१ मध्ये रत्नाबाई यांचा विवाह झाला. पती पोलिस खात्यात नोकरीला होते. पतीच्या नोकरीमुळे बाहेरगावीच वास्तव्य करावे लागत होते. तब्बल २० वर्षे नाशिक भागातील मनमाड, मालेगाव, वणी, नाशिक अशी वेगवेगळ्या ठिकाणी बाबुराव यांची बदली होत राहिली. त्या काळात रत्नाबाईही फिरतीचे बिऱ्हाड घेऊन त्यांच्यासोबत होत्या.

पुढे घडलेल्या काही घटना ह्या रत्नाबाईंच्या आयुष्याला एक नवीन वळण देणाऱ्या होत्या. एका आजारामुळे सासऱ्यांना अंधत्व आले होते. शिवाय पुढील काही वर्षांतच सासूबाईंचे निधन झाले. पतीच्या नोकरीमुळे दोघांना गावी येणे शक्य नव्हते त्यामुळे पती बाबुराव यांनी रत्नाबाईंना मुलांसोबत आपल्या सासऱ्यांकडे गावी जाण्यास सांगितले. १९८९ साली रत्नाबाई गावी आल्या आणि बाबुराव यांची पीएसआय पदावर बढती होऊन ते मुंबईला राहण्यास गेले. गावी येऊन रत्नाबाई मुलं आणि सासरे या सर्वांची जबाबदारी आनंदाने पार पडत होत्या. मुख्य म्हणजे त्यांना सरकारी निवास सोडून गावी येऊन राहण्यात कुठलाही कमीपणा वाटत नव्हता. त्यांनी या परिस्थितीकडे एक संधी म्हणून पाहिले. गावी नदीलगत सासऱ्यांची ३ एकर शेती होती. रत्नाबाईंना देखील आधीपासूनच शेतीची आवड होती. या शेतीतून आपली एक ओळख तयार करण्याचा त्यांनी ध्यास घेतला.

या जमिनीत मिरची, कोबी या भाजीपाला पिकांची लागवड करून सुरुवात केली. सुरुवातीला शेतरस्त्याची एक अडचण होती. शेताकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यांना निळवंडी मार्गे ३ किलोमीटर रोज पायी जावे लागत असे. सुरुवातीच्या काळात रत्नाबाईंची तारांबळ होत होती. सासरे अंध असल्याने त्यांची अतिशय व्यवस्थित काळजी घ्यावी लागत असे. सोबत मुलगी आणि दुसरा मुलगा लहान असल्याने त्यांचीही जबाबदारी होती. मोठा मुलगा रवी तेव्हा ८वीत असल्याने त्याची मदत होत होती. या सगळ्या धावपळीत एक गोष्ट ताईंच्या मनाला उभारी देत होती ती म्हणजे आपल्या सासऱ्यांची सेवा आज करायला मिळतेय ही त्यांच्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट होती. त्यांच्यामुळेच या शेतीसोबत त्यांचे एक नाते तयार झाले होते. पुढे दीड एकर क्षेत्रात द्राक्षबाग लावला. सुरवातीला उत्पादनाला भाव कमीच मिळत होता. सर्व उत्पादन स्थानिक बाजारपेठेत जायचे. त्या वेळी शेतावर विहीर नव्हती. नदीच्या पाण्यावर शेतीचे काम सुरु होते. पुढे शेतीतून येणाऱ्या उत्पन्नातून विहिरीचे काम सुरु केले. या विहिरीसाठी रत्नबाईंनी स्वतः रोजावर असलेल्या मजुरांसोबत काम केले. १९९२-९४ ला नवीन जमीन खरेदी केली. त्यासाठी नदीवरुन पाईपलाईन केली. नवीन ३ एकर जमिनीत २००० साली ओनरूटचा बाग लावला. दरम्यान सासऱ्यांचे निधन झाले ही घटना अस्वस्थ करणारी होती. पुढे मुलं मोठी होत होती तशी त्यांचीदेखील या सर्व कामांमध्ये मदत होत होती. २००९ मध्ये द्राक्षतज्ज्ञ मंगेश भास्कर यांच्याशी लहान मुलगा सचिन यांची भेट झाली. त्यांचे द्राक्षशेतीसाठी चांगले मार्गदर्शन मिळू लागले आणि त्यांच्याच माध्यमातून सह्याद्री फार्म्ससोबत या कुटुंबाची नाळ जोडली गेली. आज एकूण १२ एकर क्षेत्र असून ३० टन द्राक्षांची निर्यात केली जात आहे. सासऱ्यांची सेवा आणि तीनही मुलांचे शिक्षण संगोपन करत असताना दुसरीकडे शेतीत जिद्दीने कष्ट करीत रत्नाबाईंनी या शेतीलाच आज कुटुंबाचा मुख्य आर्थिक स्रोत बनवून दाखवला. आज या टप्प्यावर त्यांच्या मनात सासऱ्यांविषयी कृतज्ञतेची भावना दाटून येते. कारण त्यांच्यामुळेच रत्नाबाईंची शेतीशी नाळ जोडली गेली. सासऱ्यांच्या आशिर्वादातूनच प्रतिकुलतेशी लढण्याचे बळ मिळाल्याचे त्या आवर्जून नमुद करतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चित्त्यांवरील रोमहर्षक स्पर्धांमध्ये भाग घ्यायये आहे, तर मग या लिंकवर करा क्लीक

Next Post

खर्चही निघत नसल्याने कांदा ३००० रुपये दराने नाफेड मार्फत खरेदी करावा, या पक्षाने केली मागणी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
IMG 20220927 WA0013 e1664260874398

खर्चही निघत नसल्याने कांदा ३००० रुपये दराने नाफेड मार्फत खरेदी करावा, या पक्षाने केली मागणी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011