सोमवार, ऑक्टोबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रामायण यात्रा दर्शन (भाग -२१)…  धनुषकोडी… रामाने बांधला समुद्रावर सेतू… असे आहे हे ठिकाण

मे 13, 2023 | 5:24 pm
in इतर
0
FZruaSdacAE3kgi

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन (भाग -२१) 

धनुषकोडी: रामाने बांधला समुद्रावर सेतू
||रामसेतू खरंच होता का? ||

आपल्या देशात अशी कित्येक ठिकाणं आहेत ज्यांना पौराणिक मान्यता प्राप्त झालेली असूनही ती कित्येक वर्षे उपेक्षित राहिलेली आहेत. यापैकीच एक म्हणजे धनुष्यकोडी. हे ठिकाण हिंदूंच्या पवित्र तीर्थक्षेत्र रामेश्वरम येथे स्थित आहे. पौराणिक मान्यतेनुसार लंका जिंकून परत येत असताना बिभीषणाच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्रांनी आपल्या धनुष्याच्या एका टोकाने याठिकाणी रामसेतू तोडून टाकला. हा तोच सेतू होता ज्यावरून श्रीराम वानरसेनेसोबत लंकेपर्यंत पोहोचले आणि त्यांनी लंकादहन करून सीतेला रावणाच्या कैदेतून मुक्त केले होते.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

ॠष्यमुख पर्वतावर हनुमान आणि सुग्रीवला भेटल्यानंतर श्रीरामांनी सेना जमवली आणि त्यांनी लंकेकडे प्रस्थान केले. मलय पर्वत, चंदन वन, अनेक नद्या , धबधबे आणि वने पार केल्यानंतर श्रीराम व त्यांच्या सेनेने समुद्राकडे प्रस्थान केले. श्रीरामांनी त्यांच्या सेनेला कोडीकरई येथे एकत्रित केले.

तामिळनाडू राज्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. कोडीकरई हे ठिकाण वेलंकनीच्या दक्षिणेला आहे. ह्या गावाच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला पाल्क स्ट्रीट आहे. ह्या ठिकाणी आल्यानंतर श्रीराम व त्यांच्या सेनेच्या असे लक्षात आले की ह्या ठिकाणहून समुद्र ओलांडून जाणे शक्य नाही आणि येथे पूल सुद्धा बांधला जाऊ शकत नाही म्हणूनच श्रीराम त्यांच्या सेनेसह रामेश्वरमला गेले. रामेश्वरमला समुद्र शांत आहे. म्हणूनच येथे पूल बांधणे किंवा इथून समुद्र ओलांडणे सोपे होते.

वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामांनी तीन दिवस शोध घेतल्यानंतर त्यांना रामेश्वरमच्या पुढे २० किमी अंतरावर समुद्रात असे स्थान सापडले जिथून लंकेला जाणे सोपे होते.त्या ठिकाणाचे नाव आहे धनुषकोडी. कोडीकराई ते धनुष कोडी हे अंतर २७३ किमी आहे. विशेष म्हणजे धनुष कोडी पासून लंका फक्त २७ किमी अंतरावर आहे.
श्रीरामांनी नल व नीलच्या मदतीने लंकेपर्यंत पूल बांधला. छेदुकराई तसेच रामेश्वरांच्या आजूबाजूला ह्या घटनेच्या संदर्भातील अनेक स्मृतिचिन्हे आजही आहेत. येथील नाविक धनुषकोडीहुन लोकांना रामसेतूचे अवशेष आजही दाखवयाला नेतात.

ह्या ठिकाणी समुद्राची खोली नदी इतकीच आहे आणि काही काही ठिकाणी तळ दिसतो. खरे तर येथे एक पूल बुडाला आहे. १८६० मध्ये हा पूल स्पष्ट दिसला आणि तो हटवण्यासाटी अनेक प्रयत्न केले गेले. इंग्रज लोक ह्या पुलाला ऍडम ब्रिज म्हणत असत म्हणून ह्या ठिकाणी हेच नाव प्रचलित झाले. इंग्रजांनी हा पूल पाडला नाही परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथे रेल्वेचा ट्रॅक तयार करण्यासाठी हा पूल पाडण्यात आला. ३० मैल लांब आणि सव्वा मैल रुंद असा हा रामसेतू ५ ते ३० फूट पाण्यात बुडाला आहे. श्रीलंका सरकारला ह्या बुडालेल्या पुलावर भू मार्ग तयार करण्याची इच्छा आहे तर भारत सरकारला नौवहनासाठी सेतुसमुद्रम हा प्रोजेक्ट तयार करायचा आहे.

धनुष्यकोडी
आपल्या देशात अशी कित्येक ठिकाणं आहेत ज्यांना पौराणिक मान्यता प्राप्त झालेली असूनही ती कित्येक वर्षे उपेक्षित राहिलेली आहेत.यापैकीच एक म्हणजे धनुष्यकोडी. हे ठिकाण हिंदूंच्या पवित्र तीर्थक्षेत्र रामेश्वरम येथे स्थित आहे.पौराणिक मान्यतेनुसार लंका जिंकून परत येत असताना बिभीषणाच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्रांनी आपल्या धनुष्याच्या एका टोकाने याठिकाणी रामसेतू तोडून टाकला. हा तोच सेतू होता ज्यावरून श्रीराम वानरसेनेसोबत लंकेपर्यंत पोहोचले आणि त्यांनी लंकादहन करू न देवी सीतेला रावणाच्या कैदेतून मुक्त केले होते.

चक्रीवादळाने उध्वस्त
सन १९६४ साली धनुष्कोडी हे भारतात प्रवेश करण्यासाठीचे मोठे बंदर होते. त्यावेळी एक फार मोठे चक्रीवादळ आले, आणि त्यामुळे धनुष्कोडी शहर, तेथली रेल्वे लाईन, एक स्टीम रेल्वे इंजिन आणि त्याला जोडलेले डबे हे सर्व वाहून गेले. या चक्री वादळाला रामेश्वर वादळ असे म्हणतात. वादळाच्या वेळी समुद्राच्या लाटांची उंची साडेचार मीटर होती.१९६४ साली झालेल्या चक्रीवादळामुळे हे ठिकाण पूर्णतः पाण्याखाली गेले होते. त्यानंतर आजतागायत याठिकाणी कुणाचेही लक्ष गेलेले नाही. जवळजवळ ५० वर्षांपासून हे ठिकाण उपेक्षित आहे.आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लोक या जागेत भुताखेतांचा वावर आहे असे मानतात. असे म्हटले जाते की याच ठिकाणी समुद्रावर रामसेतूच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. श्री रामाने याच जागी हनुमानाला समुद्रावर असा सेतू उभारण्याची आज्ञा दिली होती ज्यावरून वानरसेना लंकेत प्रवेश करू शकेल. आजही धनुष्यकोडी याठिकाणी प्रभू रामाशी संबंधित कित्येक मंदिरे पाहायला मिळतात.

कधीकाळी होतं प्रसिद्ध पर्यटन स्थळ
इ.स. १९६४ साली चक्रीवादळ येण्यापूर्वी धनुष्यकोडी हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होते.असे म्हणतात की त्याकाळी इथे रेल्वे स्थानक, हॉस्पिटल्स आणि हॉटेल्स अशा सर्व सुविधा उपलब्ध होत्या. पण चक्रीवादळाने सर्व उध्वस्त करून टाकले. या ठिकाणाशी संबंधित आणखी एक गोष्ट अशी की, एकदा २०० प्रवाश्यांनी भरलेल्या एका ट्रेनला याठिकाणी जलसमाधी मिळाली होती. तेव्हापासून या ठिकाणी भूत-पिशाच्च यांचा वावर आहे असे मानले जाते. या दुर्घटनेनंतर लोकांनी या स्थळाकडे पाठ फिरवली तसेच स्थानिक सरकारनेही याकडे म्हणावे तितके लक्ष पुरवले नाही.

समुद्रात आहे गोड्या पाण्याचा साठा
धनुष्यकोडीच्या दक्षिण दिशेला गर्द निळ्या रंगाचा हिंदी महासागर आहे आणि उत्तरेला काळपट रंगाचा बंगालचा उपसागर. या दोन समुद्रांच्या दरम्यान १ किमी इतकेही अंतर नाही. दोन्ही समुद्रांचे पाणी अतिशय खारट आहे.असे असतानाही धनुष्यकोडी याठिकाणी ३ फूट खोल खड्डा खणल्यास त्यात गोड पाण्याचे झरे सापडतात. चारही बाजूंनी खारट समुद्राच्या पाण्याने वेढलेले असतानाही इथे गोड्या पाण्याचा साठा सापडणे ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट मानली जाते.

इथून दिसते श्रीलंका
रामेश्वरम द्वीपाच्या किनाऱ्यावर वसलेल्या या ठिकाणाला भारताचे दक्षिण टोक मानले जाते.धनुष्यकोडीमध्ये सर्वात उंच ठिकाणी उभे राहून समुद्राकडे पाहिल्यास श्रीलंका नजरेस पडते असे म्हटले जाते.आज निर्जन दिसणाऱ्या या ठिकाणावर पूर्वी मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती होती.आज हे स्थान भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या अगदी मध्यात असलेले पाहायला मिळते.

रामेश्वरम
रामेश्वरम हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे. रामेश्वरम शहर तमिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखातामध्ये असलेल्या रामेश्वरम द्वीपावर वसले आहे. या बेटालाच पंबन बेट म्हणतात. पंबन बेट हे भारताच्या मुख्य भूमीला पंबन पुलाने जोडले आहे. हे श्रीलंका आणि तमिळनाडू यांच्यामधील मन्नारच्या आखातात येते. रामेश्वरम हे श्रीलंकेच्या मन्नार द्वीपापासून ५० किमी अंतरावर आहे. रामेश्वरममध्ये १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर आहे. ह्यामुळे रामेश्वरम हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते.
रामायणामध्ये भगवान श्रीरामांनी रामेश्वरममधूनच लंकेमध्ये आपले सैन्य नेण्यासाठी रामसेतूची रचना केली होती. सध्या ह्या सेतूचे केवळ अवशेष शिल्लक असून एकेकाळी हा सेतू भारतीय उपखंडाला श्रीलंका बेटासोबत जोडणारा अखंड दुवा होता हे सिद्ध झाले आहे.

धनुषकोडी विशेष आकर्षणे:
धनुषकोडी भारतातील तामिळनाडूमधील रामेश्वरम बेटाच्या दक्षिणेकडील टोकावर स्थित, हे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. धनुषकोडी बीच या नावानेही ओळखले जाते.
रामायणानुसार, भगवान श्रीरामाने महासागर पार करण्यासाठी आणि आपली पत्नी सीतेला रावणापासून वाचवण्यासाठी धनुषकोडी ते लंकेपर्यंत एक पूल बांधला, ज्याला राम सेतू किंवा अॅडम्स ब्रिज म्हणून ओळखले जाते.
धनुषकोडी हा या पुलाचा प्रारंभ बिंदू होता आणि असे मानले जाते की रावणाचा भाऊ कुंभकर्णाचा वध केल्यावर भगवान रामाने या ठिकाणी आपले धनुष्य (धनुष) तोडले होते. म्हणून धनुषकोडी हे नाव आहे, ज्याचा अर्थ “धनुष्याचा शेवट” आहे.
इ.स. 1964 मध्ये, धनुषकोडीला एका प्रचंड चक्रीवादळाने धडक दिली, परिणामी शहराचा संपूर्ण नाश झाला. हे शहर कधीही पुन्हा बांधले गेले नाही.

धनुषकोडी बीच:
धनुष्कोडी बीच हा वाळूचा एक विलक्षण भाग आहे जेथे एका बाजूला बंगालच्या उपसागराचे आणि दुसऱ्या बाजूला हिंदी महासागराचे विलोभनीय दृश्य दिसते. समुद्रकिनारा हिरव्यागार झाडांनी वेढलेला आहे आणि पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आहे, ज्यामुळे ते पोहणे आणि सूर्यस्नानसाठी एक आदर्श ठिकाण आहे.
राम सेतू:
राम सेतू हा महासागर पार करून लंकेला जाण्यासाठी रामाने बांधलेला पूल आहे. हा पूल भगवान रामाच्या वानरसेनेने बांधला असे मानले जाते आणि कमी भरतीच्या वेळी तो दृश्यमान असल्याचे म्हटले जाते.
कोठंडारामस्वामी मंदिर: कोठंडारामस्वामी मंदिर हे समुद्रकिनाऱ्याजवळ असलेले एक लोकप्रिय मंदिर आहे. भगवान श्रीरामाचे हे मंदिर आहे. भगवान श्रीराम, त्यांचा भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह लंकेच्या प्रवासादरम्यान या ठिकाणी आले होते.

घोस्ट टाउन:
धनुषकोडी हे शहर 1964 च्या चक्रीवादळात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते आणि आता ते भुताचे शहर झाले आहे. येथे जुन्या शहराचे अवशेष, रेल्वे स्टेशन, चर्च आणि इतर इमारतींचे अवशेष पहायला मिळतात.
पंबन ब्रिज:
पंबन ब्रिज हा रामेश्वरम बेटाला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारा रेल्वे पूल आहे. हा पूल अभियांत्रिकीचा एक चमत्कार आहे आणि आजूबाजूच्या समुद्राचे आणि लँडस्केप्सचे आश्चर्यकारक दृश्य दिसते.

मन्नार सागरी राष्ट्रीय उद्यानाचे आखात:
धनुषकोडी जवळ मन्नार सागरी राष्ट्रीय उद्यान विकसित करण्यात आले आहे. येथे डॉल्फिन, कासव आणि व्हेल यांच्यासह विविध प्रकारचे सागरी जीव पहायला मिळतात. येथील स्वच्छ पाण्यात पर्यटक स्नॉर्कलिंग आणि स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकतात.
कुरुसदाई बेट:
धनुषकोडीजवळ कुरुसदाई यानावाचे एक लहान बेट आहे. हे बेट अनेक दुर्मिळ आणि लुप्तप्राय पक्ष्यांचे घर आहे. पक्षीनिरीक्षणासाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.

सेतु कराई:
धनुषकोडी जवळील सेतु कराई हा एक सुंदर समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनारा त्याच्या सोनेरी वाळू आणि स्वच्छ निळ्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे.
रामनाथस्वामी मंदिर:
रामनाथस्वामी मंदिर हे सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या रामेश्वरम बेटावरील लोकप्रिय मंदिर आहे.
अग्नि तीर्थम:
अग्नी तीर्थम हे रामनाथस्वामी मंदिराजवळ स्थित एक पवित्र स्नानाचे ठिकाण आहे.

हनुमान मंदिर:
हनुमान मंदिर हे धनुषकोडी समुद्रकिनारी असलेले एक लोकप्रिय मंदिर आहे.
तरंगणारा दगड:
तरंगणारा दगड ही रामेश्वरम बेटाजवळ स्थित एक अद्वितीय नैसर्गिक घटना आहे. हा दगड भगवान रामाने लंकेला पूल बांधण्यासाठी वापरला होता असे म्हणतात.

विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra Part21 dhanushkodi Ramsetu by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आदिपुरुषमध्ये हनुमानाची भूमिका साकारणार मराठमोळा देवदत्त नागे; घेतलं एवढं मानधन

Next Post

कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव का झाला? काँग्रेसला यश का मिळालं? शरद पवार म्हणाले…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
sharad pawar 5

कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव का झाला? काँग्रेसला यश का मिळालं? शरद पवार म्हणाले...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011