इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आधुनिकतेची बाधू झालेल्या या युगात डोक्यावर हात मारून घ्याव्या अशा घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशच्या आग्रामधूनही अशीच घटना समोर आली आहे. लग्नानंतर मरुधर एक्स्प्रेसमधून वरात परतीला निघाली. नवी नवरीही वऱ्हाडीमंडळींसोबत होती. तिने गोड बोलत सर्वांनाच विषकालवून काहीतरी खायला दिले. सारेच शुद्ध हरविलेल्या अवस्थेत जागेवरच निपचित पडून होते. या खतरनाक कारनाम्यानंतर संधीसाधून नववधू पसार झाली. घटना समोर येताच प्रवासी आणि रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाची बाब म्हणजे सर्वजण धोक्याबाहेर आहेत.
घटनेनंतर वऱ्हाड्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर रामफल गावाजवळ 3 लोक रेल्वे रूळावर दिसून आले. त्यांची रेल्वे स्टाफने मदत केली. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यासोबत असलेल्या नवरीने सगळ्यांना काहीतरी खाण्यासाठी दिले. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याचे त्यांनी सांगितले.
मध्येच उतरवून दिले वऱ्हाड्यांना
मरूधर एक्सप्रेसने वाराणसीहून जयपूरकडे सर्व वऱ्हाडी जात होते. परिवारासोबत नवी नवरी देखील होती. परिवाराला नव्या नवरीने प्रवासात नशेचा पदार्थ मिक्स करून काही खाण्यास दिले. ज्यामुळे सगळे लोक बेशुद्ध झाले. सगळ्या लोकांना रामफळ गावाजवळ रेल्वे रूळाच्या बाजूला उतरून देण्यात आले.
नवरी खुश नसल्याने…
रेल्वे कर्मचाऱ्यांनी पीडित परिवाराला आग्रा फोर्ट स्टेशनला आणले. त्यांना उपचारासाठी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेच पीडित परिवाराने सांगितलं की, ते बनारसहून जयपूरला जात होते. त्यांच्यासोबत नवी नवरी होती. तिने आम्हाला काहीतरी खाण्यासाठी दिलं. ज्यामुळे आम्ही बेशुद्ध झालो. असे वाटते या लग्नामुळे नवरी आनंदी नव्हती. त्यामुळे तिने हे कृत्य केले. पोलिस पुढील चौकशी करत आहेत.
Railway Bride Crime Uttar Pradesh Poisoning