बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राहुल गांधी सावरकरांविषयी नेमके काय म्हणाले? कशाच्या आधारावर म्हणाले? घ्या जाणून… (Video)

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 18, 2022 | 12:54 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Rahul Gandhi 1 e1706697653225

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या विदर्भामध्ये आहे. याच यात्रेत राहुल यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काही उदगार काढले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात चांगलेच वातावरण तापले आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने त्यावर आक्षेप घेतला आहे. असे असले तरी राहुल गांधी त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. ते नेमके काय म्हणाले, कशाच्या आधारावर म्हणाले हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारत जोडो यात्रेला गेल्या महिन्यात तमिळनाडूतील कन्याकुमारीपासून प्रारंभ झाला असून १५० दिवस चालणारी ही यात्रा १२ राज्यांमधून जाणार असून, ३५०० किमी अंतर पार करणार आहे. आता तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचली असून या यात्रेत भाजप सोडून अन्य पक्षांचे राजकीय नेते देखील सहभागी होत आहेत. ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत होत असतानाच महाराष्ट्रात मात्र त्यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपने ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कठोर टीका केल्याने भाजप नेत्यांनी भारत जोडो यात्रा थांबवावी, अशी मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांविषयी टीका करताना चक्क त्यांनी लिहिलेले पत्र सादर केल्याचे सांगण्यात येते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एक पत्र दाखवले असून सदर पत्र हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांना लिहिले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पत्र दाखवत सावरकरांचे एक पत्र आहे. त्यांनी हे पत्र इंग्रजांना लिहिलेले आहे. हे पत्र इंग्रजीत असून त्यात म्हटले आहे की, ‘सर मला तुमचे नोकर म्हणून राहायचे आहे,’ असे सावरकर या पत्रामध्ये म्हणालेले आहेत. फडणवीस यांना हे पत्र पाहायचे असेल तर त्यांनी पाहावे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.

राहूल आणखी म्हणाले की, गांधी, नेहरू, पटेल हे कित्येक वर्षे तुरुंगात होते. मात्र त्यांनी कोणत्याही पत्रावर सही केली नाही. मात्र सावरकर यांनी या पत्रावर भीतीमुळे सही केली होती. जर ते घाबरत नसते तर त्यांनी या पत्रावर कधीच सही केली नसती. त्यांनी पत्रावर जेव्हा सही केली, तेव्हच त्यांनी पटेल, नेहरू आणि गांधी यांना धोका दिला, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी या सावरकरांवर पुन्हा एकदा टीकात्मक भाष्य केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी पेटले आहे, राहुल गांधी यांच्या या वादग्रस्त विधानानंतर सावरकरांचे पणतू असलेले रणजीत सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच सावरकरांची बदनामी केली तर आपल्याला मते मिळतील, असा राहुल गांधींचा समज आहे. पण यातून ते एका देशभक्तावर खोटे आरोप करत असून बदनामी करत आहेत, असेही रणजीत सावरकर म्हणाले. यातच आता भाजप नेते देखील चांगलेच आक्रमक झाल्याने वातावरणाची चिघळण्याची शक्यता आहे.ॉ

बघा राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ

LIVE: Media Interaction | #BharatJodoYatra | Maharashtra https://t.co/nJFlqBx6Va

— Bharat Jodo Nyay Yatra (@bharatjodo) November 17, 2022

Rahul Gandhi Savarkar Statement Evidence

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांचाही ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध; हे आहेत आक्षेप

Next Post

अतिवृष्टीमुळे बाधित या विभागातील शेतकऱ्यांना १२८६ कोटींचा निधी मंजूर; राज्य शासनाचा निर्णय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
mantralay 2

अतिवृष्टीमुळे बाधित या विभागातील शेतकऱ्यांना १२८६ कोटींचा निधी मंजूर; राज्य शासनाचा निर्णय

ताज्या बातम्या

कौशल्य विकास विभाग बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सांमजस्य करार 1 1920x1280 1

नाशिक येथील ‘आयटीआय’सह राज्यातील या पाच औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार….विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक

जुलै 9, 2025
Chandrashekhar Bawankule

शेत जमिनीचे भूसंपादन…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हे निर्देश…

जुलै 9, 2025
DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011