गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राहुल गांधी सावरकरांविषयी नेमके काय म्हणाले? कशाच्या आधारावर म्हणाले? घ्या जाणून… (Video)

नोव्हेंबर 18, 2022 | 12:54 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Rahul Gandhi 1 e1706697653225

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या विदर्भामध्ये आहे. याच यात्रेत राहुल यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काही उदगार काढले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात चांगलेच वातावरण तापले आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने त्यावर आक्षेप घेतला आहे. असे असले तरी राहुल गांधी त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. ते नेमके काय म्हणाले, कशाच्या आधारावर म्हणाले हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारत जोडो यात्रेला गेल्या महिन्यात तमिळनाडूतील कन्याकुमारीपासून प्रारंभ झाला असून १५० दिवस चालणारी ही यात्रा १२ राज्यांमधून जाणार असून, ३५०० किमी अंतर पार करणार आहे. आता तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचली असून या यात्रेत भाजप सोडून अन्य पक्षांचे राजकीय नेते देखील सहभागी होत आहेत. ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत होत असतानाच महाराष्ट्रात मात्र त्यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपने ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कठोर टीका केल्याने भाजप नेत्यांनी भारत जोडो यात्रा थांबवावी, अशी मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांविषयी टीका करताना चक्क त्यांनी लिहिलेले पत्र सादर केल्याचे सांगण्यात येते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एक पत्र दाखवले असून सदर पत्र हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांना लिहिले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पत्र दाखवत सावरकरांचे एक पत्र आहे. त्यांनी हे पत्र इंग्रजांना लिहिलेले आहे. हे पत्र इंग्रजीत असून त्यात म्हटले आहे की, ‘सर मला तुमचे नोकर म्हणून राहायचे आहे,’ असे सावरकर या पत्रामध्ये म्हणालेले आहेत. फडणवीस यांना हे पत्र पाहायचे असेल तर त्यांनी पाहावे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.

राहूल आणखी म्हणाले की, गांधी, नेहरू, पटेल हे कित्येक वर्षे तुरुंगात होते. मात्र त्यांनी कोणत्याही पत्रावर सही केली नाही. मात्र सावरकर यांनी या पत्रावर भीतीमुळे सही केली होती. जर ते घाबरत नसते तर त्यांनी या पत्रावर कधीच सही केली नसती. त्यांनी पत्रावर जेव्हा सही केली, तेव्हच त्यांनी पटेल, नेहरू आणि गांधी यांना धोका दिला, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी या सावरकरांवर पुन्हा एकदा टीकात्मक भाष्य केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी पेटले आहे, राहुल गांधी यांच्या या वादग्रस्त विधानानंतर सावरकरांचे पणतू असलेले रणजीत सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच सावरकरांची बदनामी केली तर आपल्याला मते मिळतील, असा राहुल गांधींचा समज आहे. पण यातून ते एका देशभक्तावर खोटे आरोप करत असून बदनामी करत आहेत, असेही रणजीत सावरकर म्हणाले. यातच आता भाजप नेते देखील चांगलेच आक्रमक झाल्याने वातावरणाची चिघळण्याची शक्यता आहे.ॉ

बघा राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ

https://twitter.com/bharatjodo/status/1593145352734982144?s=20&t=dYhXJ-2h17W5EhIoP3YAZg

Rahul Gandhi Savarkar Statement Evidence

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांचाही ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध; हे आहेत आक्षेप

Next Post

अतिवृष्टीमुळे बाधित या विभागातील शेतकऱ्यांना १२८६ कोटींचा निधी मंजूर; राज्य शासनाचा निर्णय

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
mantralay 2

अतिवृष्टीमुळे बाधित या विभागातील शेतकऱ्यांना १२८६ कोटींचा निधी मंजूर; राज्य शासनाचा निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011