नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेविषयी आणि तिने रचलेल्या कटाविषयी अतिशय गंभीर बाब समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सध्या ताब्यात घेतले आहे. त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या या संघटनेने अनेक कट रचल्याचे स्पष्ट होत आहे.
भारताला येत्या २५ वर्षात मुस्लिम राष्ट्र बनविण्याच्यासाठी पीएफआय संघटनेने गुप्तपणे भयानक कट रचला होता. आणखी भयंकर बाब म्हणजे या कामात काही मुस्लीम राष्ट्र त्यांना प्रचंड पैसा पुरवत असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या तपासात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
गेल्या आठवड्याभरात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) देशभरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) दहशतवादी संघटनेच्या सुमारे १५ राज्यातील अड्ड्यांवर छापे टाकून त्यात विविध विभागात काम करणाऱ्या सुमारे १००पेक्षा जास्त अतिरेकी तरुणांना अटक केली आहे, त्यातून तपास यंत्रणेला देश विघातक कृत्यांची ही माहिती हाती लागली आहे, त्यामुळे देशभरात काय उडाली आहे.
पीएफआय संघटनेकडून अनेक राज्यातील मुस्लीम तरुणांना ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी वेगवेगळे आमिष दाखविण्यात येत होते, तसेच भारताला सन २०४७ पर्यंत कोणात्याही प्रकारे मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा पीएफआयचा कट होता, असा दावा देखील राष्ट्रीय तपास संस्थेने केला. शनीवार, दि. २४ रोजी धरपकड केलेल्या ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडीची मागणी करताना कोर्टात केलेल्या निवेदनात एनआयएच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
एनआयएच्या निवेदनात म्हटले आहे की, पुढील २५ वर्षात हिंसाचार पसरवून भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा पीएफआय’च्या चा डाव आहे, यासाठी आखाती देशातून पीएफआयला मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फंड देखील मिळत होता. इतकेच नव्हे तर ‘पीएफआय’चे नेते व कार्यकर्ते अनेक बेकायदा कारवायांमध्ये गुंतल्याचा दावा ‘एनआयए’ने केला आहे. देशातील नागरिकांमध्ये धार्मिक तेड व द्वेष निर्माण करणे, अशांतता निर्माण करणे, सर्वत्र असंतोष निर्माण करणे आदी कारवाया ‘पीएफआय’ करीत असल्याचे तपास यंत्रणे म्हटले आहे.
अटक केलेल्या या दहशतवादी कार्यकर्त्यांकडून जप्त केलेल्या कागदपत्रांवरून अनेक भयंकर गोष्टी उघड झाल्याचा दावा देखील ‘एनआयए’ने केला आहे. छाप्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेल्या शस्त्रांची आणि स्फोटक सामान व संशयास्पद कागदपत्राची कसून तपासणी करण्याची परवानगीही ‘एनआयए’ने कोर्टाकडे मागितली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए’ने) आणि अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी) देशातील वेगवेगळ्या राज्यात छापे टाकून केलेल्या या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पीएफआय’च्या १०६ पदाधिकारी- कार्यकर्त्यांना अटक केली होती. यात आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि अन्य काही राज्यात एकाच दिवशी, एकाच वेळी हे छापे टाकण्यात आले किंवा देशभरात खळबळ उडाली होती.
गेल्या १५ वर्षांत केरळ सह आजूबाजूच्या भागात मर्यादित असलेली पीएफआय संघटना आता देशभरात पसरली असून देशात गेल्या ५ वर्षांत अनेक ठिकाणी दंगली झाल्या, तेथील सुरक्षा एजन्सीने वेळोवेळी पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केली होती, अशीही माहिती समोर आली आहे. अन्य धर्मीयांना दहशतीखाली ठेवून नागरिकांमध्ये भीती पसरवण्याचा कट आखल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होते, असेही ‘एनआयए’ने म्हटले आहे.
याबाबत केरळचे मुख्यमंत्री आहे की, ‘पीएफआय’ने पुकारलेल्या बंद दरम्यान केरळमध्ये घडलेला हिंसाचार पूर्वनियोजित होता. तसेच ‘पीएफआय’वर बंदी घालण्यात यावी, असे राज्य सरकारचे मत आहे. याबाबत आम्ही वारंवार केंद्राला विनंती केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून घोषणाबाजी करणाऱ्या ‘पीएफआय’च्या ४२ कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. त्याआधी ‘एनआयए’ने कोंढवा भागात छापा टाकून ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
NIA Investigation PFI Conspiracy Terrorism India