मुंबई – मी सध्या स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. जे काही पुरावे हाती आले त्याआधारेच माहिती प्रसारीत करतो आहे. माझ्या अखत्यारित येणाऱ्या वक्फ बोर्डाच्या कार्यालयात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्याच्या वार्ता पसरल्या. पण, त्यात तथ्य नाही. माझ्या स्वच्छता अभियानात जर ईडी सहभागी होणार असेल आणि ईडी माझ्या घरी आली तरी मी स्वागतच करेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
ईडी किंवा अन्य तपास यंत्रणांचा धाक दाखवून माझे स्वच्छता अभियान बंद होणार नाही. ते सुरूच राहील. वक्फ बोर्डाचे काम पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे ईडी किंवा कुठल्याही यंत्रणेने त्याचा तपास करावा. नजिकच्या काळातच बोर्डाचे सर्व कामकाज डिजीटल पद्धतीने चालेल. याचाच एक भाग म्हणून सर्व जुनी कागदपत्रे आणि महत्त्वाचे दस्तावेज आम्ही स्कॅन करुन घेतले आहेत, असेही मलिक यांनी म्हटले आहे. बघा, मलिक यांची संपूर्ण पत्रकार परिषद
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण. https://t.co/AfgmbWjxvf
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 11, 2021