नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत. यासंदर्भात कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निर्देश दिले होते.
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी विविध पावले उचलली जात आहे. खासकरुन विकेंडला पर्यटक मोठ्या प्रमाणावर पर्यटनस्थळांवर गर्दी करतात. ही बाब लक्षात घेऊन आता पर्यटनस्थळांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या पर्यटनस्थळांमध्ये ब्रह्मगिरी पर्वत, दुगारवाडी धबधबा, अंजनेरी पर्वत, हरिहर किल्ला, साल्हेर किल्ला, पहिणे, भासक्र गड, रामशेज किल्ला, भावली धरण, वैतरणा धरण, गंगापूर धरण यांचा समावेश आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश खालीलप्रमाणे