नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवार (१० जानेवारी) पासून ३१ जानेवारीपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. तशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी याची माहिती दिली आहे. लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर या ठिकाणी ३१ जानेवारीपर्यंत पहिली ते नववीच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, राज्यातील सर्व महाविद्यालयेही येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे घोषित केले आहे. कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय पर्याय नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
बघा भुजबळ यांची संपूर्ण पत्रकार परिषदेचा व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे