मंगळवार, जुलै 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये ‘वाल्मीकि रामायण – वर्तमान युगाच्या संदर्भात’ या विषयावर १४ ते १८ नोव्हेंबरपर्यंत व्याख्यानमाला

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 11, 2022 | 9:55 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221111 WA0147 e1668183924314

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राणी भवन आणि नर्मदालयातर्फे ‘वाल्मीकि रामायण – वर्तमान युगाच्या संदर्भात’ या विषयावर पाच दिवशीय व्याख्यानमाला १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत नाशिक येथील राणी भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ५.३० ते ७ वाजेपर्यंत ही व्याख्यानमाला संपन्न होणार असून प्रव्राजिका विशुध्दानंदा (भारती ठाकुर ) या व्याख्यानमालेत वाल्मीकि रामायण व वर्तमान युग यामधील संदर्भ उलगडून सांगणार आहे.

देशातील वेगवेगळ्या शहारात ही व्याख्यानमाला संपन्न झाली असून या व्याख्यानमालेतील विषयामागील पार्श्वभूमी सांगतांना प्रव्राजिका विशुध्दानंदा (भारती ठाकुर ) यांनी माहिती दिली, नर्मदालयातल्या काही विद्यार्थ्यांनी एकदा मला प्रश्न विचारला, “हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या रामायणातल्या कथा आता एकविसाव्या शतकात का वाचायच्या ? आजच्या काळाशी त्याचा काय संबंध ? या प्रश्नांचं एका वाक्यात उत्तर देऊन चालणार नव्हतं. युवा पिढीला रामायण कथेतून नेमकं काय घेण्यासारखं आहे ? वर्तमान युगाच्या संदर्भात त्याची सांगड कशी घालायची ? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पुन्हा एकदा वाल्मिकी रामायण वाचायला सुरुवात केली. त्यावर अनेक विद्वानांनी दिलेल्या व्याख्यानांचे संकलनही उपलब्ध होते. त्यात मुख्यत्वे करून प्रसिद्ध जलतज्ज्ञ श्री माधवराव चितळे आणि स्वामी गोविंद देव गिरी महाराजांच्या पुस्तकांचा मूळ वाल्मिकी रामायण समजून घेतांना उपयोग झाला.
रामायण कथा ही फक्त श्रीरामांची नाही तर ती तितकीच सीतेची देखील आहे. तशीच ती लक्ष्मण, भरत शत्रुघ्न यांची आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराची आहे. श्रीमान हनुमानाची – त्याच्या समर्पण भावाची, त्यागाची सुद्धा आहे. ह्या कथेत खलनायक असलेल्या रावणाची पण ही कथा आहे. सुग्रीव असो वा बिभीषण – प्रत्येकाची त्यात महत्वाची भूमिका आहे. कोविडपूर्वीही मी वाल्मिकी रामायणावर व्याख्याने दिली होती. कोविडने दिलेल्या निवांतपणात ‘वाल्मिकी रामायणाचा सध्याच्या परिस्थितीत अभ्यास का करायचा’ याची उत्तरं शोधण्याचा पुन्हा प्रयत्न केला तर काही मुद्दे लक्षात आले. वर्तमान युगाच्या संदर्भात रामायण का वाचायचं ? फक्त मनोरंजनासाठीची कथा म्हणून नाही तर –
१) रामायण काळातील राज्यकारभार, शिष्टाचार आणि प्रशासन व्यवस्था समजावून घेण्यासाठी. महर्षी वशिष्ठ म्हणतात की राम कसा आहे ? तर रामो विग्रहवान धर्म: | मानवी जीवनातल्या उत्तुंग गुणांचं साक्षात साकार दर्शन म्हणजे श्रीराम. परिस्थितीने रामाला आयुष्यात वारंवार धक्के दिले आहेत. पण त्यावर मात करून स्वत:चं, समाजाचं आणि पर्यायाने संपूर्ण राष्ट्राचं चारित्र्य कसं घडवायचं, अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला शांतपणे सामोरं कसं जायचं ते शिकण्यासाठी आणि मानवी नातेसंबंधांची गुंतागुंत समजून घेण्यासाठी.
२) राजकुमार आणि भावी राजा असूनही सामान्य नागरिकांशी श्रीरामांची वागणूक कशी होती ते जाणून घेण्यासाठी तसेच श्रीरामांच्या अनेक गुणविशेषांचा अभ्यास करण्यासाठी.
३) श्रीरामांच्या आणि सुग्रीवाच्या संघटन कौशल्याचा, तत्कालीन प्रगत विज्ञानाचा, भौगोलिक परिस्थितीचा, पर्यावरणाचा, वनवासी जीवनाचा अभ्यास करण्यासाठी.
४) श्री. भरत, शत्रुघ्न, हनुमान आणि बिभीषणाचा त्याग, समर्पण भाव समजून घेण्यासाठी.
५) भगीरथ प्रयत्न म्हणजे काय ? भगीरथाचे पाणी व्यवस्थापन कसे होते ? गंगा या पृथ्वीवर खरंच कशी अवतरली हे समजून घेण्यासाठी.
६) रावणाचं युद्ध कौशल्य, विद्वत्ता आणि त्याच्या राजधानीची सुरक्षा व्यवस्था याच्या जोडीने त्याची विकृत मनोवृत्ती त्याच्या मृत्युला आणि सर्वनाशाला कशी कारणीभूत ठरली हे समजून घेण्यासाठी.
७) आतंकवाद ही काही २० -२१ व्या शतकाची निर्मिती नाही तर हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली एक प्रवृत्ती आहे. धर्म आणि अधर्म यातली लढाई समजून घेण्यासाठी.
वाल्मीकि रामायण वाचत असतांना जाणवलं, की हे सगळं तरुण पिढीपर्यंत पोहोचायला पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून त्यादृष्टीने ‘वाल्मीकि रामायण – वर्तमान युगाच्या संदर्भात’ या विषयावर व्याख्यानमाला वेगवेगळ्या संस्थांमध्ये आयोजित होत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींचे अडकलेले काम आज लागेल मार्गी; जाणून घ्या, शनिवार, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Next Post

‘भारत जोडो’ यात्रेत होतेय नाशिकच्या युवतीची चर्चा; पण का?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Capture 10

'भारत जोडो' यात्रेत होतेय नाशिकच्या युवतीची चर्चा; पण का?

ताज्या बातम्या

Screenshot 20250714 200642 Collage Maker GridArt 1

नाशिक जिल्हा परिषदेच्या सुपर ५० उपक्रमातील ६ विद्यार्थ्यांची आयआयटीत निवड…

जुलै 14, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884

विजयी मेळावा हा मराठीच्या मुद्द्यावर होता, राजकारणाशी संबध नाही…राज ठाकरे

जुलै 14, 2025
VidhanSabha prashnottare 04 1024x512 1

पाणीपुरवठा प्रकल्पात एकाच कामासाठी दोन योजना; विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

जुलै 14, 2025
Mhada Home e1680604067392

घरांची विक्री मंदावली,खरेदीदार अधिक सावध…बघा, हा अहवाल

जुलै 14, 2025
Shirdi Sai baba e1727984889927

शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबा संस्थानला ६.३१ कोटींहून अधिक देणगी प्राप्त

जुलै 14, 2025
Untitled 32

नाशिकच्या या नेत्याचा ३०० कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात मुंबईत प्रवेश…

जुलै 14, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011