India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

चक्क गाव विकणे आहे! संतप्त ग्रामस्थांनी केला ठराव; नाशिक जिल्ह्यातील या गावाची सर्वत्र चर्चा

India Darpan by India Darpan
March 8, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २००५ साली वर्धा जिल्ह्यातील डोरली येथील गावकऱ्यांनी शेतीतून उत्पन्न मिळत नाही म्हणून ‘गाव विकणे आहे’ अशी पाटी गावाबाहेर लावली आणि अनोखे आंदोलन केले होते. संपूर्ण देशात या आंदोलनाची चर्चा झाली होती. त्यानंतर एवढ्या वर्षांतही महाराष्ट्रातील परिस्थिती बदललेली दिसत नाही. कारण आता नाशिक जिल्ह्यातील फुलेमाळवाडी येथील गावकऱ्यांनीही हेच पाऊल उचलले आहे.

देवळा तालुक्यातील हे गाव आहे. जवळपास ५३४ हेक्टर क्षेत्र असून अख्खे गाव शेती व्यवसायावर जगते. पण शेतमालाला भावच मिळत नसल्याने मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि साध्यासाध्या गरजा पूर्ण करणेही कठीण झाले आहे. या गावातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला आणि आणखी काही नगदी पिकं येथील शेतकरी घेतात. पण कुठल्याच पिकाला योग्य भाव मिळत नाही.

सरकार शेतकऱ्यांपेक्षा ग्राहक हिताला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे टोकाचा निर्णय घेण्याची वेळ गावावर आली. गाव विकले तर त्यातून येणाऱ्या पैशातून पुढचं आयुष्य काढता येईल, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे गाव विकण्याचा निर्णय संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन घेतला आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या ठरावाची प्रत सरकारकडेही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक अधिकारी, जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी चांगलेच गोंधळात पडले आहेत. प्रवीण बागूल, अमोल बागूल, राकेश सोनवणे, अविनाश बागूल आणि अक्षय शेवाळे या शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

स्थलांतर कारणीभूत
फुलेमाळवाडीतील गावकऱ्यांनी परिस्थितीला कंटाळून कर्नाटक आणि गुजरात राज्यामध्ये स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भातही गावकऱ्यांनी एकत्र येऊन ठराव केला होता आणि सरकारकडे ठरावाची प्रत पाठवली होती.

लोकप्रतिनिधींची अडचण
फुलेमाळवाडीतील लोकांनी घेतलेल्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची चांगलीच अडचण झाली आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना गावाला असा निर्णय घ्यावा लागणे हे दुर्दैवी मानले जात आहे. त्यामुळे आता गावकऱ्यांची समजूत घालावी की सरकारला स्पष्टीकरण द्यावे, अशा गोंधळात ते पडले आहेत.

Nashik District Villagers Decision Sale Village


Previous Post

फलक रेखाटनातून कलाशिक्षकाने दिल्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Next Post

शेतकऱ्यांना सरकार काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करा विधानसभेत विरोधकांची मागणी

Next Post

शेतकऱ्यांना सरकार काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करा विधानसभेत विरोधकांची मागणी

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group