नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी शुक्रवारी आत्महत्या केली. या तिघांपैकी दोघांनी विषारी औषध सेवन करून तर एकाने गळफास लावला. या आत्महत्येप्रकरणी अंबड व म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना अंबड गावातील दत्तनगर भागात घडली. किरण रंगनाथ येलमामे (१८ रा.माऊली चौक,दत्तनगर) या तरूणाने शुक्रवारी आपल्या राहते घरातील लोखंडी पाईपाच्या आडगईली साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही बाब सायंकाळच्या सुमारास निदर्शनास आली. दोघा घटनांप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास पोलिस नाईक महाजन व हवालदार चव्हाण करीत आहेत. दुसरी घटना सिडकोतील हेडगेवारनगर भागात घडली. येथे राहणारे पांडूरंग रामचंद्र पाटील (५२) हे शुक्रवारी सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये बेशुध्द अवस्थेत आढळून आले होते. भाचा जीवन पाटील यांनी तातडीने नजीकच्या गॅलेक्सी सुप्रीम केअर हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केल्याचे समोर आले आहे. तर तिसरी घटना म्हसरुळ येथे घडली. येथील अजय विष्णू घोडके (२२ रा.निर्मलनगर,मेरी म्हसरूळ रोड) या युवकाने गेल्या बुधवारी (दि.२) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. कुटुंबियांनी त्यास तात्काळ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता शुक्रवारी उपचार सुरू असतांना डॉ.वलैया यादव यांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत.