अजय सोनवणे, नांदगाव
जलसुमृध्दीतून विकासाकडे या उपक्रमांर्तगत मोरझर गावचा जलसाठा होणार समुध्द,सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सरपंच लिना पाटील यांच्या पुढाकारातून नदीपात्राचे केले खोलीकरण.. नाशिक जिल्हयातील नांदगाव तालूक्याची अनेक गाव दुष्काळी म्हणून ओळखली जातात.गावातील जलसाठा समुध्द करायचा असेल तर उपाय योजनाही अधिक प्रभावी असणे गरजेचे आहे.हीच बाब लक्षात घेत मोरझरच्या सरपंच लिना समाधान पाटील यांनी गावाला दुष्काळाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी जलसमृध्दीतून विकासाकडे या उपक्रमांर्तगत गावातील लेंडी नदी व सिमेंट बंधारे,पाझर तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम युवा मित्र या संवयंसेवी संस्थेच्या सहकार्यातून आणि टाटा ट्रस्ट व गॅलेक्सी या दोन संस्थांच्या सीएसआर निधी उपलब्ध करुन घेत कामचा शुभारंभ पावसाळ्यापुर्वी करुन घेतला.नदी,नाले,सिमेट बंधारे तीन मातीनाला बांध असे एकुण दोन किलोमीटर काम करत त्यातील गाळ काढल्याने पावसाळ्यात पाणी अधिक प्रमाणात साठवण होणार आहे त्याचा फायदा गावातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीला सिंचनासाठी होणार आहे. एकुणच गावाच्या सरपंचपदी एखादी महिला असेल आणि काम करण्याची धमक आणि गावक-यांच सहकार्य मिळाले तर गावाचा चेहरा-मोहरा बदलू शकते.युवा मित्र संस्थेच्या माध्यमातून केलेल्या या कामामुळे मोरझर गावाने जिल्हयात प्रथम क्रमांक पटकाविल्याने सर्वत्र त्यांच कौतूक होत आहे.